मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटांचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला होता. राहुल नार्वेकरांनी बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला. तर दोन्ही पक्षांच्या आमदारांपैकी कोणालाही अपात्र ठरवले नाही. त्यामुळे ठाकरे गटाने (Thackeray Group) या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली तर शिवसेनेनेही ठाकरे गटाचे आमदार का अपात्र ठरवण्यात आले नाहीत, याबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता या प्रकरणी शिवसेनेने मुंबई हायकोर्टाला (Mumbai Highcourt) तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली आहे.
शिवसेनेचे वकील भरत गोगावले यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमदारांचा कार्यकाल संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती गोगावलेंनी याचिकेत केली आहे. आमदारांचा कार्यकाल सप्टेंबरअखेरीस संपत आहे. त्यामुळे न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून ६ ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गटाने तातडीच्या सुनावणीवर आक्षेप आहे.
विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मनमानी, बेकायदा आणि असंविधानिक आहे. रेकॉर्डवर सादर करण्यात आलेले पुरावे विधानसभा अध्यक्षांनी विचारात घेतले नाहीत. इतकेच काय तर ठाकरे गटातील आमदारांनी स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले होते, हे लक्षात घेण्यात विधानसभा अध्यक्ष अपयशी ठरले, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे सात महिन्यांनंतर तातडीच्या सुनावणीचा आग्रह का केला जातोय? असे म्हणत उध्दव ठाकरे गटाचे वकील विनयकुमार खातू यांनी आक्षेप नोंदवला आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…