MLA disqualification case : ठाकरेंचे आमदार अपात्र ठरवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची हायकोर्टात धाव!

केली तातडीच्या सुनावणीची मागणी


मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटांचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला होता. राहुल नार्वेकरांनी बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला. तर दोन्ही पक्षांच्या आमदारांपैकी कोणालाही अपात्र ठरवले नाही. त्यामुळे ठाकरे गटाने (Thackeray Group) या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली तर शिवसेनेनेही ठाकरे गटाचे आमदार का अपात्र ठरवण्यात आले नाहीत, याबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता या प्रकरणी शिवसेनेने मुंबई हायकोर्टाला (Mumbai Highcourt) तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली आहे.


शिवसेनेचे वकील भरत गोगावले यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमदारांचा कार्यकाल संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती गोगावलेंनी याचिकेत केली आहे. आमदारांचा कार्यकाल सप्टेंबरअखेरीस संपत आहे. त्यामुळे न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून ६ ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गटाने तातडीच्या सुनावणीवर आक्षेप आहे.



काय म्हटले आहे याचिकेत?


विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मनमानी, बेकायदा आणि असंविधानिक आहे. रेकॉर्डवर सादर करण्यात आलेले पुरावे विधानसभा अध्यक्षांनी विचारात घेतले नाहीत. इतकेच काय तर ठाकरे गटातील आमदारांनी स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले होते, हे लक्षात घेण्यात विधानसभा अध्यक्ष अपयशी ठरले, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे सात महिन्यांनंतर तातडीच्या सुनावणीचा आग्रह का केला जातोय? असे म्हणत उध्दव ठाकरे गटाचे वकील विनयकुमार खातू यांनी आक्षेप नोंदवला आहे.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा