MLA disqualification case : ठाकरेंचे आमदार अपात्र ठरवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची हायकोर्टात धाव!

केली तातडीच्या सुनावणीची मागणी


मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटांचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला होता. राहुल नार्वेकरांनी बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला. तर दोन्ही पक्षांच्या आमदारांपैकी कोणालाही अपात्र ठरवले नाही. त्यामुळे ठाकरे गटाने (Thackeray Group) या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली तर शिवसेनेनेही ठाकरे गटाचे आमदार का अपात्र ठरवण्यात आले नाहीत, याबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता या प्रकरणी शिवसेनेने मुंबई हायकोर्टाला (Mumbai Highcourt) तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली आहे.


शिवसेनेचे वकील भरत गोगावले यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमदारांचा कार्यकाल संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती गोगावलेंनी याचिकेत केली आहे. आमदारांचा कार्यकाल सप्टेंबरअखेरीस संपत आहे. त्यामुळे न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून ६ ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गटाने तातडीच्या सुनावणीवर आक्षेप आहे.



काय म्हटले आहे याचिकेत?


विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मनमानी, बेकायदा आणि असंविधानिक आहे. रेकॉर्डवर सादर करण्यात आलेले पुरावे विधानसभा अध्यक्षांनी विचारात घेतले नाहीत. इतकेच काय तर ठाकरे गटातील आमदारांनी स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले होते, हे लक्षात घेण्यात विधानसभा अध्यक्ष अपयशी ठरले, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे सात महिन्यांनंतर तातडीच्या सुनावणीचा आग्रह का केला जातोय? असे म्हणत उध्दव ठाकरे गटाचे वकील विनयकुमार खातू यांनी आक्षेप नोंदवला आहे.

Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०