Pune news : लवासामध्ये दरड कोसळून तीन बंगले ढिगाऱ्याखाली! अनेकजण बेपत्ता

अतिवृष्टीमुळे घडली दुर्घटना


पुणे : पुण्यामध्ये (Pune news) पावसाने हाहाकार (Heavy rainfall) माजवला आहे. अतिवृष्टीमुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच पुण्याच्या लवासामधून एक दुर्घटना समोर आली आहे. लवासा हिल स्टेशनवर तीन बंगल्यावर दरड कोसळली (Lavasa Landslide). या घटनेमध्ये २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.


स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिमुसळधार पावसामुळे लवासा हिल स्टेशन येथे दरड कोसळली. यामुळे दोन बंगले ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून यात २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाला माहिती देऊनही अद्याप कोणीही मदतीसाठी न पोहोचल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


पुणे जिल्ह्यात मागील २४ तासांत मुसळधार पाऊस पडला असून लवासा या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजेच ४५३.५ मिली मिटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळेच या ठिकाणी दुर्घटना घडून नागरिकांना मोठा फटका बसला आहे. पुण्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशामध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Comments
Add Comment

Phaltan Doctor death case : ब्रेकिंग! फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर अखेर अटक

सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणात आता एक

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात