Pune news : लवासामध्ये दरड कोसळून तीन बंगले ढिगाऱ्याखाली! अनेकजण बेपत्ता

अतिवृष्टीमुळे घडली दुर्घटना


पुणे : पुण्यामध्ये (Pune news) पावसाने हाहाकार (Heavy rainfall) माजवला आहे. अतिवृष्टीमुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच पुण्याच्या लवासामधून एक दुर्घटना समोर आली आहे. लवासा हिल स्टेशनवर तीन बंगल्यावर दरड कोसळली (Lavasa Landslide). या घटनेमध्ये २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.


स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिमुसळधार पावसामुळे लवासा हिल स्टेशन येथे दरड कोसळली. यामुळे दोन बंगले ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून यात २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाला माहिती देऊनही अद्याप कोणीही मदतीसाठी न पोहोचल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


पुणे जिल्ह्यात मागील २४ तासांत मुसळधार पाऊस पडला असून लवासा या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजेच ४५३.५ मिली मिटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळेच या ठिकाणी दुर्घटना घडून नागरिकांना मोठा फटका बसला आहे. पुण्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशामध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे