Pune news : लवासामध्ये दरड कोसळून तीन बंगले ढिगाऱ्याखाली! अनेकजण बेपत्ता

अतिवृष्टीमुळे घडली दुर्घटना


पुणे : पुण्यामध्ये (Pune news) पावसाने हाहाकार (Heavy rainfall) माजवला आहे. अतिवृष्टीमुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच पुण्याच्या लवासामधून एक दुर्घटना समोर आली आहे. लवासा हिल स्टेशनवर तीन बंगल्यावर दरड कोसळली (Lavasa Landslide). या घटनेमध्ये २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.


स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिमुसळधार पावसामुळे लवासा हिल स्टेशन येथे दरड कोसळली. यामुळे दोन बंगले ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून यात २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाला माहिती देऊनही अद्याप कोणीही मदतीसाठी न पोहोचल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


पुणे जिल्ह्यात मागील २४ तासांत मुसळधार पाऊस पडला असून लवासा या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजेच ४५३.५ मिली मिटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळेच या ठिकाणी दुर्घटना घडून नागरिकांना मोठा फटका बसला आहे. पुण्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशामध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक