निवडणूक आयोगाचा दोन्ही पवारांना आणि उबाठाला जोरदार झटका!

पवार आणि ठाकरेंचा पक्ष प्रादेशिक तर आप ठरला राष्ट्रीय पक्ष


निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!


नवी दिल्ली : देशभरात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार झटका दिला आहे. या तिन्ही पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला असून त्यांच्या पक्षाला प्रादेशिक पक्षाचा (Regional Party) दर्जा दिला आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.


पुढील काही महिन्यात महाराष्ट्रसह हरियाणा आणि इतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.


शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेल्या पक्षाला नाव आणि चिन्हासाठी लढा द्यावा लागला होता. त्यानंतर या पक्षांना चिन्ह मिळाले तर आता निवडणूक आयोगाकडून या पक्षांना राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही पक्षाला निवडणूक आयोगाकडून कोणत्याही पक्षाला प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देताना त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना मिळालेल्या मतांची संख्या लक्षात घेतली जाते. यासाठी १९६८ च्या नियमांचा निकष ग्राह्य धरला जातो.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे