निवडणूक आयोगाचा दोन्ही पवारांना आणि उबाठाला जोरदार झटका!

पवार आणि ठाकरेंचा पक्ष प्रादेशिक तर आप ठरला राष्ट्रीय पक्ष


निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!


नवी दिल्ली : देशभरात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार झटका दिला आहे. या तिन्ही पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला असून त्यांच्या पक्षाला प्रादेशिक पक्षाचा (Regional Party) दर्जा दिला आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.


पुढील काही महिन्यात महाराष्ट्रसह हरियाणा आणि इतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.


शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेल्या पक्षाला नाव आणि चिन्हासाठी लढा द्यावा लागला होता. त्यानंतर या पक्षांना चिन्ह मिळाले तर आता निवडणूक आयोगाकडून या पक्षांना राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही पक्षाला निवडणूक आयोगाकडून कोणत्याही पक्षाला प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देताना त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना मिळालेल्या मतांची संख्या लक्षात घेतली जाते. यासाठी १९६८ च्या नियमांचा निकष ग्राह्य धरला जातो.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद