मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी काल निवडणूक (Vidhanparishad Election) पार पडली. या १२ वा उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे निवडणूक अटीतटीची झाली. त्यात दोन्ही पक्ष आमचाच विजय होणार असा दावा करत होते. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) काही मते फुटणार असा दावाही सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. लोकसभेत महायुतीचा पराभव झाला मात्र, विधानपरिषदेत मात्र अखेर महायुतीच (Mahayuti) अव्वल ठरली आहे. नववा उमेदवार जिंकून आणत महायुतीने मविआला धक्का दिला आहे. शिवाय यात काँग्रेसची आठ मतं फुटल्याचंही बोललं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी काटेकोर रणनीती आखत विजय खेचून आणला. महायुतीने आपले सर्व ९ उमेदवार निवडून आणले. मविआचे दोन उमेदवार निवडून आले. तर शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. काँग्रेसची आठ मतं फुटली आहेत. चुरशीच्या ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला.
भाजपचे पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, योगेश टिळेकर हे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच निवडून आले. सदाभाऊ खोतांनाही निवडून आणण्यात भाजपने यश मिळवलं. एकनाथ शिंदेंचे शिवसेना कृपाल तुमाने आणि भावना गवळी हे दोन्ही शिलेदार सहज निवडून आले. अजित पवारांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर या दोघांनाही निवडून आणलं. दुसऱ्या उमेदवारासाठी मताचा कोटा कमी पडत असतानाही त्यांनी ही किमया करून दाखवली.
काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय झाला. पण काँग्रेसचे आठ आमदार फुटल्याने त्याचा फायदा महायुतीला झाला. मतांच्या फोडाफोडीवरून एकनाथ शिंदेंनी मविआला टोला लगावला आहे. लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा विधान परिषदेत मविआला धोबीपछाड देत महायुतीने काढला आहे. पण खरी लढाई विधानसभेची आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांचाही विजय झाला. शेकापच्या जयंत पाटलांना पराभवाचा धक्का बसला आहे.
पंकजा मुंडे- २६
परिणय फुके- २६
अमित गोरखे- २६
सदाभाऊ खोत- २३
योगेश टिळेकर- २६
शिवाजीराव गर्जे – २४
राजेश विटेकर – २३
भावना गवळी – २४
कृपाल तुमाने – २५
मिलिंद नार्वेकर – २४
जयंत पाटील, शेकप – १२
प्रज्ञा सातव- २५
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…