Vidhanparishad Election : विधानपरिषदेत महायुतीच अव्वल! काँग्रेसची ८ मतं फुटली

अजितदादांची सरशी, शरद पवारांचा डाव फसला... 


मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी काल निवडणूक (Vidhanparishad Election) पार पडली. या १२ वा उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे निवडणूक अटीतटीची झाली. त्यात दोन्ही पक्ष आमचाच विजय होणार असा दावा करत होते. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) काही मते फुटणार असा दावाही सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. लोकसभेत महायुतीचा पराभव झाला मात्र, विधानपरिषदेत मात्र अखेर महायुतीच (Mahayuti) अव्वल ठरली आहे. नववा उमेदवार जिंकून आणत महायुतीने मविआला धक्का दिला आहे. शिवाय यात काँग्रेसची आठ मतं फुटल्याचंही बोललं जात आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी काटेकोर रणनीती आखत विजय खेचून आणला. महायुतीने आपले सर्व ९ उमेदवार निवडून आणले. मविआचे दोन उमेदवार निवडून आले. तर शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. काँग्रेसची आठ मतं फुटली आहेत. चुरशीच्या ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला.


भाजपचे पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, योगेश टिळेकर हे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच निवडून आले. सदाभाऊ खोतांनाही निवडून आणण्यात भाजपने यश मिळवलं. एकनाथ शिंदेंचे शिवसेना कृपाल तुमाने आणि भावना गवळी हे दोन्ही शिलेदार सहज निवडून आले. अजित पवारांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर या दोघांनाही निवडून आणलं. दुसऱ्या उमेदवारासाठी मताचा कोटा कमी पडत असतानाही त्यांनी ही किमया करून दाखवली.



काँग्रेसची ८ मतं फुटली


काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय झाला. पण काँग्रेसचे आठ आमदार फुटल्याने त्याचा फायदा महायुतीला झाला. मतांच्या फोडाफोडीवरून एकनाथ शिंदेंनी मविआला टोला लगावला आहे. लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा विधान परिषदेत मविआला धोबीपछाड देत महायुतीने काढला आहे. पण खरी लढाई विधानसभेची आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांचाही विजय झाला. शेकापच्या जयंत पाटलांना पराभवाचा धक्का बसला आहे.



कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली ?


भाजप


पंकजा मुंडे- २६
परिणय फुके- २६
अमित गोरखे- २६
सदाभाऊ खोत- २३
योगेश टिळेकर- २६



अजित पवार राष्ट्रवादी


शिवाजीराव गर्जे - २४
राजेश विटेकर – २३



शिवसेना- (शिंदे)


भावना गवळी - २४
कृपाल तुमाने - २५



शिवसेना (उद्धव ठाकरे)


मिलिंद नार्वेकर - २४


जयंत पाटील, शेकप - १२



काँग्रेस


प्रज्ञा सातव- २५

Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि