Vidhanparishad Election : काँग्रेसचे आमदार मतदान न करता अद्याप पक्ष कार्यालयात!

आतापर्यंत १२४ आमदारांनी केलं मतदान; तर ठाकरेंचे आमदार कुठे?


मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी (Vidhanparishad Election) आज मतदान होत आहे. सकाळी ९ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत महायुतीने मोठा डाव टाकला असल्याची शक्यता आहे. मतदानाच्या दिवशीच महाविकास आघाडीचे काही आमदार फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने (NCP Ajit Pawar group) काँग्रेसचे (Congress) तब्बल ५ आमदार फोडल्याचं सांगितलं जातंय. तर भाजपकडून (BJP) देखील काँग्रेसचे ४ आमदार फोडण्यात आल्याची माहिती आहे. एकूणच काँग्रेसचे तब्बल ८ आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप उमेदवारांना मतदान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मविआला मोठा धक्का बसू शकतो.


तर दुसरीकडे, काँग्रेसच्या आमदारांनी अद्याप मतदानच केलेलं नाही. ते अजूनही पक्ष कार्यालयात आहेत. ११ वाजेपर्यंत १२४ आमदारांनी मतदान केल्याची माहिती आहे. मात्र, काँग्रेसचा एकही आमदार विधानभवनात पोहाचलेला नाही. तर ठाकरे गटाचेही (Thackeray Group) आमदार परळच्या आयटीसी हॉटेलमध्ये मुक्कामाला होते व ते आता मतदानासाठी विधानभवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता