Manoj Jarange Patil : छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी निघणार मराठ्यांची महाशांतता रॅली!

१०० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ४००० पोलिसांचा तगडा बंदोबस्त


छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची येत्या १३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शांतता रॅली (Shantata Rally) निघणार आहे. सगेसोयरेच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मागण्यांसाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. या महाशांतता रॅलीची जय्यत तयारी सुरु झाली असून प्रशासन देखील कामाला लागले आहे. रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांची महाशांतता रॅली शनिवारी १३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरात पार पडणार आहे. या रॅलीसाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. सकाळी ११ वाजता संभाजीनगरच्या सिडको येथील वसंतराव नाईक चौकातून या रॅलीला प्रारंभ होणार आहे. तर क्रांती चौक येथे या रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये १०० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ४००० पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्यासोबत मराठा बांधव देखील या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



जालना रोड काही काळ बंद


मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील महाशांतता रॅलीसाठी मुख्य वर्दळीचा मार्ग असलेला जालना रोड सुमारे ८ ते ९ तासांसाठी बंद राहणार आहे. दरम्यान या रॅलीमध्ये पोलिसांचे विशेष लक्ष असणार असून रॅलीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून समन्वयकांना सूचना देण्यात आल्या आहेत.



सहभागी समाज बांधवांसाठी विशेष सुविधा


लाखोच्या संख्येने समाज बांधव जिल्हाभरातून या रॅलीत सहभागी होणार आहेत. या सर्वांसाठी चहा, नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था रॅली मार्गावर करण्यात आली आहे. तसेच रॅलीच्या मार्गावर सहभागी समाज बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक, ॲम्ब्युलन्स, फिरती स्वच्छतागृहे ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रॅलीदरम्यान कोणाला उपचाराची गरज भासली तर अत्याधुनिक १० ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि अनुभवी नर्स औषधोपचारासह सज्ज असणार आहेत.



वाहनतळाची व्यवस्था


छत्रपती संभाजीनगरमधील रॅलीदरम्यान मनोज जरांगे यांच्यासाठी क्रांती चौक येथे भव्य स्टेज उभारण्यात येणार आहे. तसेच विविध गावात आणि तालुक्याच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बैठका घेत आहेत. यामध्ये हजेरी लावणाऱ्या समाज बांधवांसाठी विविध ठिकाणी वाहन पार्किंगची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. पैठण तालुक्यातून येणाऱ्यांसाठी बीड बायपास रोडवरील जबिंदा मैदान, कन्नड, खुलताबाद, वैजापूर तर गंगापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी कर्णपुरा, अयोध्या मैदान येथे, तर फुलंब्री आणि सिल्लोड येथील समाज बांधवांची वाहने जाधववाडी (नवा मोंढा) येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात