भिवंडी महापालिका हद्दीत पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस

तीन दिवसांत १२० नागरिकांना श्वानदंश


भिवंडी : भिवंडी महानगरपालिका (Bhiwandi municipal) हद्दीतील भटक्या कुत्र्यांची नसबंदी (Sterilization of dogs) करणारे श्वान निर्बीजीकरण केंद्र मागील कित्येक वर्षांपासून बंद असल्यामुळे, भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची (Street Dogs) आणि त्यामुळेच पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढीस लागलेली आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास बहुतांश वेळा रात्रीच्या वेळी नागरिकांना दुचाकी चालकांना होत असताना, या भटक्या कुत्र्यांपैकी काही पिसाळल्याने, अनेकांना दंश करण्याच्या घटना भिवंडी शहरात वाढीस लागलेल्या आहेत. ७ व ८ जुलै या दोन दिवसांत तब्बल १३५ जणांना श्वान दंश झाल्याची घटना समोर आली असून, संपूर्ण जून महिन्यात ८८६ जणांना श्वान दंश झाल्याची माहिती स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षका डॉ. माधवी पंधारे यांनी दिली.


७ जुलै रोजी कामतघर परिसरात ६० श्वान दंश झाले होते, तर शांतीनगर भागात ८ जुलै रोजी ४५ जणांना श्वान दंश झाले. या व्यतिरिक्त इतर भागात सुद्धा श्वान दंशाच्या घटना घडल्या असून, या दोन दिवसांत एकूण १३५ रुग्णांना रेबीज प्रतिबंधक पहिला डोस देण्यात आला आहे. रुग्णालयात रेबीज डोसचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती अधीक्षका डॉ. माधवी पंधारे यांनी दिली आहे.


भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचा निर्बीजीकरण मागील कित्येक वर्षांपासून बंद असून, आयुक्त अजय वैद्य यांनी २०२३ पासून शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी दोन वेळा निविदा प्रक्रिया राबविली. परंतु संस्थांकडून प्रतिसाद आला नाही. दरम्यान आचारसंहिता सुरू झाली होती. ८ जुलै रोजी या बाबतच्या फाईल्स वर स्वाक्षरी करून संबंधित विभागाला तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या असून आठ दिवसांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्यासाठी, यंत्रणा सज्ज करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र