सोलापूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त सध्या महाराष्ट्रातील शेकडो दिंड्या विठुरायाच्या भेटीला निघाल्या आहेत. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची (Ashadhi Wari) मोठी गर्दी दिसून येत आहे. अशातच काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विठुरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी वारीत पायी सहभागी होणार असल्याची घोषणा केली. राहुल गांधींच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असताना साताऱ्यातील माजी खासदार रणजीत निंबाळकर (Ranjeet Nimbalkar) यांनी राहुल गांधींवर बोचरी टीका केली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर यांनी राहुल गांधींच्या या गोष्टीला विरोध केला आहे. राहुल गांधी केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी वारीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्यात कॅट वॉक करायला येऊ नये, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांवर केली.
रणजीत निंबाळकर म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षाने या भोळ्या भाबड्या वारकरी संप्रदायाचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करू नये. आजवर राहुल गांधी यांना कधी विठ्ठल अथवा कोणत्याही देवाची पालखी आठवली नाही. मात्र सध्याच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा घेण्यासाठी पालखीत सहभागी होण्याचा चर्चा सुरू केल्या आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. त्यासोबत पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारने कोट्यावधींचा निधी वारकरी संप्रदायाला दिला आहे. मात्र यात कोणताही राजकीय वापर केला नसल्याचा दावा निंबाळकर यांनी केला आहे.
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…
मुंबई महानगरपालिकेचा आदेश मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे.…