Monsoon trips : पुण्यानंतर ठाण्यातही पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी!

पर्यटक वाहून जाण्याच्या घटनांनंतर सर्वच ठिकाणचे जिल्हाप्रशासन अलर्ट मोडवर


ठाणे : गेल्या काही दिवसांत पावसाळी पर्यटनासाठी (Monsoon tourism) गेलेल्या पर्यटकांचा जोरदार पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. लोणावळ्याच्या भुशी डॅममध्ये (Lonavla Bhushi dam) तर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या घटनांनंतर राज्य सरकारने संध्याकाळी सहा नंतर पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी घातली. त्यासोबतच आता सर्वच ठिकाणचे जिल्हाप्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे. पुण्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील (Thane District) पावसाळी पर्यटनस्थळांवर मनाई आदेश लागू करण्यात आले आहे.


अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील धबधबे, नदी आणि धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. भुशी डॅमसारखी दुर्घटना टाळण्यासाठी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. कलम १४४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ३४ अन्वये हे आदेश लागू करण्यात आले आहेत. हे मनाई आदेश पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लागू करण्यात आले असून त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशांती माने यांनी दिली.



कोणत्या पर्यटनस्थळांवर असणार बंदी?


जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर धबधबा, भोज नदी, दहिवली नदी, आंबेशिव नदी, चंदेरी गड, चांदप, आस्नोली नदी, बारवी नदीवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. कल्याण तालुक्यातल्या कांबा, पावशेपाडा, खडवली नदी, टिटवाळा नदी, गणेश घाटावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे धरण, माळशेज घाट, नाणेघाट, गोरखगडवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.


भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी नदी परिसर आणि शहापूर तालुक्यातील भातसा धरण आणि परिसर, माहुली किल्ला आणि पायथा, अशोक धबधबा, आजा पर्वत, सापगाव नदी किनारा, कळंबे नदी, कसारा घाट आणि कसारा घाटातील धबधबे या पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'हिरव्या सापांना ठेवण्याची गरज, महाराष्ट्र जिहादमुक्त करणारच!'; नाशिकच्या 'कॉर्पोरेट जिहाद'वरून मंत्री नितेश राणे आक्रमक

पाकिस्तानातून यांचा अब्बा आला, तरी 'देवभाऊ' सोडणार नाहीत... मुंबई : "आमच्यावर हिंदू-मुस्लिम केल्याची टीका

Chief Minister Devendra Fadnavis : नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणाची शक्ती -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सर्व जगामध्ये नवकार महामंत्राचा आजच्या पवित्र दिवशी सामूहिक जप होत आहे. आपली संस्कृती ही

Nashik Fake Police : AI,पोलीस आणि स्त्रियांची लाखोंची फसवणूक; तोतया पोलीस अटकेत

नाशिक : नाशिक जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्टिफिशियल

Pune Cycle Race : जगाच्या नकाशावर गेलेली सायकल स्पर्धा 26 ते 31 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार

पुणे : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल

Spirituality to your everyday life : अध्यात्म म्हणजे जगापासून पळणे नव्हे, तर शांततेने जगणे; गौर गोपाल दास यांनी सांगितले दैनंदिन जीवनात अध्यात्म आणण्याचे ५ सोपे मार्ग

मुंबई : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात 'अध्यात्म' हा शब्द ऐकला की, अनेकांना वाटते की यासाठी घरदार सोडून

LED fishing boats will be cancelled : एलईडी मासेमारी बोटींना डिझेल पुरवठा करणाऱ्या मच्छिमार संस्थांची नोंदणी रद्द करणार

मंत्री नितेश राणे यांचा इशारा; पारंपरिक मच्छिमारांना त्रास देणाऱ्यांची खैर नाही मुंबई :