Share

तत्त्वज्ञान, काव्य या साऱ्यांचा कळसच झालेला आपल्याला यात अनुभवास येतो. भक्ताची साधना सुरू होते. ती करता करता एक वेळ अशी येते की, तो शेवटच्या टप्प्याला पोहोचतो. तिथे तो भक्त एक आणि देव दुसरा असे वेगळेपण उरत नाही. तो त्या तत्त्वाशी, परमेश्वराशी एक होऊन जातो. या अवस्थेचं वर्णन माऊलींनी केले आहे.

ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

अठरावा अध्याय म्हणजे ‘कळसाध्याय’ होय. खरंच नावाप्रमाणे हा अध्याय आहे. तत्त्वज्ञान, काव्य या साऱ्यांचा कळसच झालेला आपल्याला यात अनुभवास येतो. आज पाहूया या अध्यायातील अशाच अलौकिक ओव्या!

भक्ताची साधना सुरू होते. ती करता करता एक वेळ अशी येते की, तो शेवटच्या टप्प्याला पोहोचतो. तिथे मग तो भक्त एक आणि देव दुसरा असे वेगळेपण उरत नाही. तो त्या तत्त्वाशी, परमेश्वराशी एक होऊन जातो. या अवस्थेचं वर्णन करताना माऊलींच्या काव्याला बहर येतो. काय म्हणतात ते? ऐकूया तर…

‘स्वप्नात पाहिलेल्या स्त्रीला जागे होऊन, मोठ्या प्रेमाने आलिंगन देऊ गेले असता देणारा आणि आलिंगन देण्याची वस्तू दोन्ही नसून एकटाच पुरुष जसा असतो…’ ओवी क्र. ११५८

‘अथवा दोन लाकडांच्या घर्षणाने जो अग्नी उत्पन्न होतो, तो दोन्ही लाकडांना जाळून लाकडाचे नाव नाहीसे करून आपणच होतो.’ ओवी क्र. ११५९

‘तेथ स्वप्नींचिया प्रिया। चेवोनि झोंबों गेलिया।
ठायिजे दोन्ही न होनियां। आपणचि जैसें॥ (११५८)
‘चेवोनि’ शब्दाचा अर्थ आहे प्रेमाने, तर ‘झोंबो गेलिया’चा अर्थ आलिंगन देऊ गेले असता…
ज्ञानदेवांनी दिलेल्या या दोन्ही दृष्टांतात किती अर्थ आहे! किती सौंदर्य आहे!

स्वप्नातील स्त्रीला प्रेमाने आलिंगन देणारा पुरुष हा दाखला खास वाटतो. स्वतः ब्रह्मचारी असणारे ज्ञानदेव जनसामान्यांचं मन नेमकं ओळखतात म्हणून त्यांना जवळचा वाटणारा हा दृष्टांत घेतात. प्रेम ही भावना माणसासाठी खूप महत्त्वाची, मूलभूत आहे. त्यात स्त्री-पुरुष प्रेम तर खासच गोष्ट. या दृष्टांतातून सुचवू काय पाहतात ज्ञानेश्वर? तर भक्त आणि परमेश्वर यांच्यातील प्रेम! भक्ताला लागलेली परमेश्वराची ओढ किती? तर स्त्री-पुरुष प्रेमाप्रमाणे उत्कट! पुन्हा त्यात काय मांडलं आहे? स्वप्नात पाहिलेल्या स्त्रीला प्रत्यक्षात आलिंगन देऊ पाहणारा पुरुष! मग त्याला जाणीव होणं की, स्वप्नातील स्त्री आणि पुरुष हे दोन्ही आपणच आहोत. त्याप्रमाणे भक्त आणि परमेश्वर यांच्यात घडतं. भक्त देवाला शोधत असतो, नंतर त्याला जाणवतं, देव त्याच्या मध्येच आहे.

पुढील दृष्टांत लाकडाच्या घर्षणातून उत्पन्न होणाऱ्या अग्नीचा आहे. लाकूड घासलं जाणं, या क्रियेतून या प्रवासातील साधना, कष्ट सुचवले आहेत. पुढे ती दोन्ही लाकडं नाहीशी होणं, फक्त अग्नी राहणं यात खोल अर्थ आहे. भक्ताच्या मनातील वासना, विकार जळून जाणं, त्याच्या ठिकाणी अग्नीप्रमाणे प्रखर तेज येणं या साधनेमुळे!

गीतेतील तत्त्वज्ञान उलगडून दाखवताना, ज्ञानदेव दाखल्यांची अशी सुंदर माला सादर करतात! ते समजून घेताना जाणीव होते, त्यांच्या काव्यप्रतिभेची! अशावेळी आपल्या अंतरी आठवण होते, त्या वचनाची ‘जे न देखे रवी ते देखे कवी.’ ज्ञानदेव असे कवी आहेत की, आज सातशे पंचवीस वर्षांनंतरही त्यांची दृष्टांतमाला तेवढीच ताजी आणि
ताकदीची वाटते!!

manisharaorane196@ gmail.com

Recent Posts

Buldhana Crime : धक्कादायक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास महिलेचा नकार; डॉक्टराने केले असे काही…

बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. बुलढाण्यात…

25 mins ago

Worli Hit and Run : धक्कादायक! वरळीत हिट अँड रन प्रकरणात महिलेचा मृत्यू

कारचालक फरार मुंबई : राज्यभरात हिट अँड रनच्या (Heat And Run) वाढत्या केसेसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले…

30 mins ago

रोजगारनिर्मितीसह विदर्भाच्या विकासावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : विदर्भात अधिकाधिक रोजगारनिर्मिती होण्याच्या दृष्टीने सर्व सुविधांनी परिपूर्ण औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यावर आपण…

39 mins ago

मुंबई मेट्रोला ४,६५७ कोटी निधी मिळणार!

मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग ३ साठी केंद्र सरकारद्वारे जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) यांच्या…

1 hour ago

सुरतमध्ये बहुमजली इमारत कोसळली, ७ जणांचा मृत्यू, रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू

सुरत: सुरतच्या सचिन परिसरात शनिवारी बहुमजली इमारत कोसळली. ही इमारत कोसळल्यानंतर एनडीआरएफ, फायर ब्रिगेडचे संघ…

2 hours ago

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य, १५व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा…

3 hours ago