IPL 2025 on Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ MI विरुद्ध SRH सामन्यात मोठे बदल, मृतांना दिली जाणार श्रद्धांजली

चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू 


हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये आजच्या MI विरुद्ध SRH सामन्यात मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. ज्यासाठी बीसीसीआयद्वारे काही मोठे बदल करण्यात आले आहे.


आज, बुधवारी (२३ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2025 ) चा ४१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल.


जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्ध, या सामन्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) चार मोठे बदल केले आहेत. ज्यामध्ये सर्वप्रथम, हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सामन्यादरम्यान पंच आणि खेळाडू दंडाला काळ्या फिती बांधून मैदानात उतरतील. त्याचप्रमाणे आजचा सामना चिअरलीडर्स आणि फटाक्यांच्या आतषबाजी शिवाय खेळवला जाणार आहे.



MI vs SRH सामन्यात मोठे बदल


आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने पहलगाम, काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात मृतांना श्रद्धांजली देण्याकरिता खेळात काही बदल केले आहेत.
यामधील पहिला सर्वात मोठा बदल म्हणजे सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू आणि पंच हातावर काळी फित बांधणार आहेत.


तर दुसरा मोठा बदल असा असेल कि, सामना सुरु होण्यापूर्वी एक मिनिटाचे मौन पाळत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.


त्यांनतर तिसरा बदल म्हणजे आयपीएलचा उत्साह वाढवण्यासाठी चिअरलीडर असतात पण आजच्या सामन्यात त्यांचाही समावेश नसणार आहे आणि चौथा बदल या सामन्यात कोणत्याही प्रकारे फटाक्यांची आतिषबाजी होणार नसल्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत