Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा!

  182

पंकजा मुंडेंची लागली वर्णी; आणखी कोणाकोणाला मिळाली संधी?


मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) धामधूम सुरु झाली आहे. यासाठी राजकीय पक्षांनी (Political parties) उमेदवारांची घोषणा देखील करण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडूनही मुंबई प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी दहा जणांची यादी केंद्राकडे पाठवली होती. त्यातून आता भाजपकडून विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. विधानपरिषदेसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे व त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे.


यंदा लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघात पराभव पत्करावा लागलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आली आहे. त्यांच्यासह योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे व सदाभाऊ खोत अशा एकूण पाच जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.


लोकसभेच्या निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपकडून सावधरित्या पावलं उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून विधानपरिषदेच्या यादीमध्ये जातीय समतोल राखल्याची चर्चा आहे. मित्रपक्षांना संधी म्हणून रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांनाही भाजपकडून संधी दिली गेली आहे.



पंकजा मुंडे यांची उमेदवारी महत्त्वाची


पंकजा मुंडे यांच्या लोकसभेतील पराभवानंतर बीडमधील वंजारी समाज दुखावला गेला होता. चार जणांनी आत्महत्या देखील केली होती. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी त्यांच्या समर्थकांकडून मागणी केली जात होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पंकजा मुंडे यांना विधानसपरिषदेवर संधी देण्याचं भाजपने ठरवलं आहे. त्यामुळेच त्यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना देण्यात आलेली विधानपरिषेदची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.

Comments
Add Comment

कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने होणार...

मुंबई : मुंबईकरांची  वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे. 

Hide Tide Alert: विक्रमी पावसानंतर मुंबईत भरतीचा इशारा, मुंबईच्या चौपाट्यांवर न जाण्याचे आवाहन

आज समुद्र खवळणार मुंबईत हाय टाइड अलर्ट जारी जूनच्या अखेरीस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान

Bus Strike : 'पालकांनो लक्ष द्या', मुलांच्या शाळेची बस न येण्याची शक्यता! विविध मागण्यांसाठी खाजगी बस चालकांचा १ जुलैपासून बेमुदत संप

स्कूल बस सेवांवरही होणार परिणाम मुंबई : मुंबईतील खाजगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर

‘१०० मिमीपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा आराखडा तयार करा’

केंद्र सरकारकडून मुंबईला स्वतंत्र निधी मिळणार मुंबई : मुंबईची सध्याची पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ५५

अखेर कर्नाक पुलाला आता लोकार्पणाची प्रतीक्षा

बुधवारी रात्री उशिरापर्यंत पूल विभागाने फिरवला शेवटचा हात मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर

मनाने, शरीराने सुदृढ राहिलात, तरच आयुष्याची लढाई जिंकाल

विश्वास नांगरे-पाटील यांनी महापालिका शाळांमधील मुलांच्या पंखात भरले बळ मुंबई  : सध्याच्या विद्यार्थ्यांभोवती,