मुलांच्या अंगावर टीनशेड कोसळल्याने सात खेळाडू जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

ठाणे : ठाण्यात फुटबॉल खेळणाऱ्या मुलांच्या अंगावर टीनशेड कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. यात सात मुलं गंभीर जखमी झाले आहेत.


शुक्रवारी रात्री ठाण्यातील एका टर्फमध्ये काही मुलं फुटबॉल खेळत होती. यावेळी अचानक पाऊस आणि वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. या वाऱ्यामुळे शेजारच्या इमारतीवरील टीनशेड थेट या मुलांच्या अंगावर येऊन कोसळले. या घटनेत सात मुलं गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या घटनंतर आज शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलांची भेट घेतली. तसेच त्यांना सरकारकडून मदतीचे आश्वासन दिले.


यासंदर्भात बोलताना, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी याठिकाणी १७-१८ जण फुटबॉल खेळत होते. जोरदार हवेमुळे शेजारच्या इमारतीवरून एक टीनशेड या मुलांच्या अंगावर येऊन कोसळले. यात ७ जण गंभीर जखमी झाले. यापैकी ४ जण बरे असून तिघांची प्रकृती नाजूक आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Dhurandhar : रि-रिलीजच्या सिरीजमध्ये रणवीरच्या धुरंधरची एन्ट्री; या दिवशी होणार रिलीज

रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची अजूनही फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ असून लवकरच धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला

युद्धामुळे अडकलेली लारा दत्ता मुलीसह भारतात परतली; सांगितला थरारक अनुभव

मुंबई : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत त्या काळात लारा