Solapur news : सोलापुरातील बार्शीत निकृष्ट दर्जाच्या रस्ते बांधकामामुळे नागरिकांचा संताप

महिन्याभरापूर्वी तयार केलेला रस्ता नागरिकांनी हाताने उकरुन दाखवला


सोलापूर : सोलापूरच्या (Solapur) बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे महिन्याभरापूर्वीच तयार करण्यात आलेल्या रस्त्याविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या रस्त्याची बांधणी निकृष्ट दर्जाची (Poor quality road construction) असल्याचा आरोप नागरिकांनी केला. इतकंच नव्हे तर रस्त्यातील माती कोणत्याही साधनाशिवाय त्यांनी हाताने उकरुन दाखवली.


मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी-तुळजापूर उपळे दुमाला गावातील नागरिक या गोष्टीमुळे संतप्त झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेत कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.


बार्शीतील स्थानिक रहिवासी सचिन नाईकवाडी यांनी सांगितले की, 'रस्त्याची अवस्था ही अशी झाली आहे आणि कंत्राटदार पैसे घेऊन निवांत बसले आहेत. पहिल्यापासून रस्ता खराबच झाला आहे, काम होऊन अजून दीड महिना देखील पूर्ण झालेला नाही'. त्यामुळे हा रस्ता पूर्ववत करुन द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे