मान्सूनपूर्व पावसाने तळा तालुक्यात पुन्हा विजेचा लपंडाव

विजेचा पाच तासांचा ब्रेक; विजेअभावी नागरिकांची होते गैरसोय


तळा : पावसाळा सुरू होताच, तळा तालुक्यातील बत्तीगुल होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. दरवर्षी पावसाच्या आगमनापासूनच तळा तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू होतो आणि एकदा गेलेली वीज जवळजवळ ४ ते ५ तास येत नाही. यामुळे विजेअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होते.


पावसाळा सुरू व्हायच्या आधी महावितरण विभागाने झाडे तोडणे, बॉक्स मेंटेनन्स, ब्रेकर मेंटेनन्स, जिओडी मेंटेनन्स, जीर्ण खांब बदलणे यांसारखी पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे वेळीच पूर्ण करणे गरजेचे असते. मात्र पावसाळा तोंडावर आला असताना देखील महावितरण विभागाची ही कामे पूर्ण झाली नव्हती. परिणामी जराजरी ढगांचा गडगडाट अथवा रिमझिम पावसाला सुरुवात होताच, महावितरण विभागाकडून तळा तालुक्याची बत्तीगुल करण्यात येते. यामुळे पावसाळ्यात जरी नागरिकांना थंडावा जाणवत असला, तरी लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना रात्रभर मच्छरांचा सामना करावा लागतो.


काही वेळा मुसळधार पावसामुळे संपूर्ण दिवसभर देखील तालुक्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येतो व याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, वीजबिल वसुलीसाठी महावितरण जेवढ्या तत्परतेने मेहनत घेते, ती मेहनत पावसाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी का घेत नाही, असा प्रश्न देखील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.


पावसाला अद्याप सुरुवात झाली आहे. मात्र तळा गावात सतत ४ ते ५ तास वीज जात असल्याने, ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गावातील सगळीच कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे मातीची रास रस्त्यावर साचली आहे. वाहनांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात गावातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीजबील वसुली केली जाते. मात्र तेवढ्या तत्परतेने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये बरीच नाराजी व्यक्त होत आहे.


Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे