Shinde Vs Thackeray : मुख्यमंत्री शिंदेंचे शिलेदार ठाकरेंचे नवनिर्वाचित खासदारही फोडणार?

  128

नरेश म्हस्के यांच्या दाव्याने ठाकरे गटाच्या गोटात उडाली खळबळ


मुल्ला-मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका न पटल्याने 'हे' दोन खासदार शिंदेंना साथ देणार


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (Shivsena) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election)१५ जागा लढवल्या होत्या, त्यांपैकी ७ जागांवर शिंदेंचे खासदार निवडून आलेत. तर, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उबाठाने महाराष्ट्रात २१ जागा लढवलेल्या त्यापैकी ९ जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यंदा जास्त जागा मिळाल्या त्यामुळे मविआ जोमात आहे. मात्र, त्याच दरम्यान शिवसेनेचे ठाण्यातील नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केलेल्या एका दाव्यामुळे ठाकरेंच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर अनेक ठाकरे गटाचे अनेक मोठमोठे नेते आपल्या बाजूने वळवले. बड्या नेत्यांनी साथ सोडल्याने ठाकरे गट खिळखिळा झाला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र अनेकांची घरवापसी होणार की काय, असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, आता शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या खासदारांनाही आपल्यासोबत घेणार असल्याच्या चर्चा म्हस्के यांनी केलेल्या दाव्यामुळे सुरु झाल्या आहेत.



काय म्हणाले नरेश म्हस्के?


ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधला. आपल्या मतदारसंघात विकासकामे झाली पाहिजेत, अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो, असे सांगितले आहे. मुल्ला-मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असे या खासदारांनी आम्हाला सांगितले. मात्र, पक्षांतर केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाईचा धोका टाळण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखला आहे. आम्ही सहा खासदारांची संख्या जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोदी साहेबांना पाठिंबा देऊ, असे या दोन खासदारांचे म्हणणे असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे.


Comments
Add Comment

आषाढीनिमित्त मध्य रेल्वे तीन एकेरी विशेष गाड्या चालवणार

मुंबई (प्रतिनिधी): पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील काही भागात आजपासून चार दिवस जोरदार पाऊस बरसणार असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या मुंबई

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही