Share Market: आज वेळेआधी बंद होणार बाजार! गुंतवणूकदारांनी वेळ घ्या नोंदवून

मुंबई: लोकसभा निवडणुकीचे(loksabha election 2024) मतदान सुरू झाले आणि मतदारांचा पहिला कौल आला आणि शेअर बाजाराला जबरदस्त झटका बसला. सोमवारच्या दिवशी अत्यंत उंचीवर गेलेले सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी निकालाच्या दिवशी मात्र चांगलेच आपटले.


सेन्सेक्स कोरोना काळानंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात घसरला. ५ टक्क्यांहून अधिकने घसरण्याची ही कोरोना नंतरही पहिलीच वेळ. तर निफ्टीतही ५ टक्क्यांहून अधिक घट झाली. बाजारात लोअर सर्किटची शक्यता बनत आहे. अशातच बाजार नियामक सेबीने काही काळासाठी ट्रेडिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जेव्हा बाजारात लोअर सर्किट येतो तेव्हा असे होते.


बाजार नियामक सेबीने वेळ जाहीर केली आहे. यात बाजारात ट्र्रेडिं कधी थांबवली जाईल हे सांगण्यात आले आहे. या दरम्यान, शेअरची खरेदी विक्री होणार नाही. म्हजेच आज ४ जूनला जर लोअर सर्किट लागला तर बाजारात २ वेळा ट्रेडिंग हॉल्ट केले जाईल. जर आज वेळेच्या एक तास आधी मार्केट बंद केले जाणार आहे.



कधी-कधी होणार नाही ट्रेडिंग


शेअर बाजारात आज तीन वेळा ट्रेडिंग बंद केले जाईल. यात तिसऱ्यांदा मार्केट बंद केले जाईल. सेबीच्या टायमिंगनुसार पहिले १० टक्के लोअर सर्किट लागल्यानंतर दुपारी १ वाजता बाजारात ट्रेडिंग बंद होईल. त्यानंतर १.४५ ला ट्रेडिंग सुरू होईल. यानंतर लोअर सर्किट लागले तर २ ते २.३० दरम्यान पुन्हा १५ मिनिटांसाठी ट्रेडिंग बंद होईल.


दोनदा ट्रेडिंग रोखल्यानंतर अखेर आज बाजार एक तास आधी बंद केला जाईल. मात्र जर तिसऱ्यांदा लोअर सर्किट लागला तर हे होईल. गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी हे केले जात आहे. सेबीनुसार ४ जूनला २.३० वाजल्यानंतर बाजारात ट्रेडिंग होणार नाही.

Comments
Add Comment

Threat Mail : मोठी बातमी! राजधानी दिल्लीत खळबळ, संसद भवनासह ९ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एक मेल आला अन् थेट...

नवी दिल्ली :  देशाच्या संसदेसह राजधानीतील नऊ नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्याने

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

'देशातील नक्षलवादाचा ३१ मार्चपर्यंत समूळ नायनाट करणार'

रायपूर  : केंद्र सरकारच्या सुरक्षा-केंद्रित रणनीतीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे डाव्या

महाराष्ट्रात लवकरच मतदारयाद्यांची सखोल तपासणी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या पाच राज्यांतील मतदारयाद्यांची सखोल तपासणीवर (एसआयआर) लक्ष केंद्रित

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण