Share Market: सुरूवातीच्या कौलानंतर गुंतवणूकदारांना मोठे नुकसान, बाजार कोसळला

मुंबई: एक दिवस आधी शानदार वेग घेतल्यानंतर आज मंगळवारी लोकसभा निवडणूक २०२४च्या मतमोजणीच्या दिवशी मात्र बाजार चांगलाच कोसळला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सुरूवातीच्या कौलानंतर बाजार चांगलाच कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचे मात्र चांगलेच नुकसान झाले आहे.सुरूवातीच्या सत्रात गुंतवणूकदारांना ११ लाख कोटीहून अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे.



असा विखुरला बाजार


आज सकाळी बाजाराची सुरूवात मोठ्या नुकसानासह झाली. सेन्सेक्स उघडताच १ हजार अंकांनी कोसळला. जसजसे लोकसभा निवडणुकीचे कौल हाती येत आहेत तसतसा शेअर बाजार कोसळत गेला. सकाळी ९.५५ ला सेन्सेक्स १५०० अंकांनी घसरला होता.



गुंतवणूकदारांचे इतके नुकसान


या मोठ्या घसरणीचा परिणाम बाजारातील लिस्टेड कंपन्यांच्या व्हॅल्यूवरही झाला. बीएसई लिस्टेट कंपन्यांच्या बाजारातील पूंजीकरण कमी होऊन ४११.५१ लाख कोटी रूपयांवर आला. सोमवारी बाजाराने जबरदस्त उसळी घेतली होती. निफ्टी तसेच सेन्सेक्समध्ये ऐतिहासिक वाढ झाली होती. सेन्सेक्स २,५०७.४७ अंकांनी वाढ होत तो ७६,४६८.७८ अंकांवर बंद झाला होता. यावेळी सेन्सेक्सने ७६,७३८,८९ अकांचे नवे शिखर गाठले होते.


बाजाराचे कोसळणे हे लोकसभा निवडणुकीच्या सुरूवातीच्या कौलाचा परिणाम आहे. सुरूवातीच्या कौलामध्ये भाजपचे अनेक उमेदवार पिछाडीवर असल्या कारणाने याचा बाजाराव परिणाम झाला आहे.

Comments
Add Comment

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १७ वर्षांची जेल; भ्रष्टाचार प्रकरणात पत्नी बुशरा बीबीलाही मोठी शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या

Rajdhani Express Accident : आसाममध्ये काळजाचा थरकाप! राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ८ हत्तीचं जागीच दुर्दैवी मृत्यू

आसाममधील जमुनामुख जवळील सानरोजा भागात शुक्रवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी रेल्वे अपघात झाला.

केदारनाथमधून बर्फ गायब; निसर्गाचा इशारा की हवामान बदलाचा परिणाम?

उत्तराखंड : ऋतुचक्र बदलत चाललंय या आधी आपण फक्त बोलतच होतो पण आता ते प्रत्यक्षात घडत जात आहे. कारण केदारनाथ

भारत-ओमानची मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा मस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या