Pandharpur Vitthal Temple : आता ज्ञानोबा तुकारामांच्या काळातील विठ्ठल मंदिर पाहायला मिळणार!

  472

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर चांदीने चकाकणार


पंढरपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिराचे रुप पालटणार आहे. त्यामुळे भक्तांना आता ज्ञानोबा तुकारामांच्या काळातील विठ्ठल मंदिर पाहायला मिळणार आहे. गेल्या काही वर्षात मंदिराचे रंगरंगोटी करून, अनावश्यक गोष्टी करण्यात आल्या होत्या. आता हे मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे मूळ रूपात येणार आहे. मंदिरातील पुरातन रुप परत येण्यासाठी तब्बल ७३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे काम केले असून नव्याने तयार झालेले मंदिर भाविकांना सातशे वर्ष मागे घेऊन जाणार आहे.



८०० ते ९०० किलो चांदीचा वापर


पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे ७०० वर्षापूर्वीचे मुळ रुप समोर आल्यानंतर आता मंदिरातील नऊ दरवाजे चांदीने चकाकणार आहेत. यासाठी सुमारे ८०० ते ९०० किलो चांदीचा वापर केला जाणार आहे. विठ्ठल गर्भ गृहाच्या मुख्य दरवाजा बरोबरच चौखांबी आणि सोळखांबी मंडपातील आठ दरवाजांवर चांदीचे नक्षीकाम केले जाणार आहे. या बरोबरच मंदिरातील गरुड खांब, मेघडंबरी देखील चांदीने मडवली जाणार आहे.



पाषाणावरही केले सुबक नक्षीकाम


प्राचीन विठ्ठल मंदिराप्रमाणे, पाषाणातील असणारे नक्षीकाम, खांबा वरील विविध मूर्ती, देवता, यांच्यावर असणारे नक्षीकाम करण्यात आले आहे.त्यामुळे विठ्ठलाचा चौखांबी आणि सोळखांबी मंडप पुरातन रूपांमुळे अधिक मनमोहक दिसणार आहे.



२ जूनपासून भाविकांना मिळणार चरणस्पर्श


विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्याच्या कामासाठी मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी विठुरायाचे चरणदर्शन १५ मार्चपासून दीड महिन्यांसाठी बंद केले होते. या काळात भाविकांना केवळ मुखदर्शन मिळत होते. मात्र तब्बल ७९ दिवसानंतर पुन्हा एकदा विठुरायाच्या पायावरील दर्शनास २ जूनपासून सुरुवात होणार आहे. तर ७ जुलै पासून विठ्ठलाचे आषाढी साठी २४ तास दर्शन सुरू असणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित