Pandharpur Vitthal Temple : आता ज्ञानोबा तुकारामांच्या काळातील विठ्ठल मंदिर पाहायला मिळणार!

  503

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर चांदीने चकाकणार


पंढरपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिराचे रुप पालटणार आहे. त्यामुळे भक्तांना आता ज्ञानोबा तुकारामांच्या काळातील विठ्ठल मंदिर पाहायला मिळणार आहे. गेल्या काही वर्षात मंदिराचे रंगरंगोटी करून, अनावश्यक गोष्टी करण्यात आल्या होत्या. आता हे मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे मूळ रूपात येणार आहे. मंदिरातील पुरातन रुप परत येण्यासाठी तब्बल ७३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे काम केले असून नव्याने तयार झालेले मंदिर भाविकांना सातशे वर्ष मागे घेऊन जाणार आहे.



८०० ते ९०० किलो चांदीचा वापर


पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे ७०० वर्षापूर्वीचे मुळ रुप समोर आल्यानंतर आता मंदिरातील नऊ दरवाजे चांदीने चकाकणार आहेत. यासाठी सुमारे ८०० ते ९०० किलो चांदीचा वापर केला जाणार आहे. विठ्ठल गर्भ गृहाच्या मुख्य दरवाजा बरोबरच चौखांबी आणि सोळखांबी मंडपातील आठ दरवाजांवर चांदीचे नक्षीकाम केले जाणार आहे. या बरोबरच मंदिरातील गरुड खांब, मेघडंबरी देखील चांदीने मडवली जाणार आहे.



पाषाणावरही केले सुबक नक्षीकाम


प्राचीन विठ्ठल मंदिराप्रमाणे, पाषाणातील असणारे नक्षीकाम, खांबा वरील विविध मूर्ती, देवता, यांच्यावर असणारे नक्षीकाम करण्यात आले आहे.त्यामुळे विठ्ठलाचा चौखांबी आणि सोळखांबी मंडप पुरातन रूपांमुळे अधिक मनमोहक दिसणार आहे.



२ जूनपासून भाविकांना मिळणार चरणस्पर्श


विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्याच्या कामासाठी मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी विठुरायाचे चरणदर्शन १५ मार्चपासून दीड महिन्यांसाठी बंद केले होते. या काळात भाविकांना केवळ मुखदर्शन मिळत होते. मात्र तब्बल ७९ दिवसानंतर पुन्हा एकदा विठुरायाच्या पायावरील दर्शनास २ जूनपासून सुरुवात होणार आहे. तर ७ जुलै पासून विठ्ठलाचे आषाढी साठी २४ तास दर्शन सुरू असणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत