Pune car Accident : अग्रवाल पिता-पुत्राला चार दिवसांची पोलीस कोठडी!

  69

आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?


पुणे : पुणे अपघात (Pune car Accident) प्रकरणी अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) याला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मुलगा अल्पवयीन असूनही त्याच्या हातात कार दिल्यामुळे ही अटक करण्यात आली होती. तर मुलाचे आजोबा सुंरेंद्र कुमार अग्रवाल (Surendra Kumar Agarwal) यांना देखील २८ मे पर्यंत तुरुंगात ठेवण्यात आलं. मुलाचा आरोप ड्रायव्हरने स्वतःच्या अंगावर घ्यावा, यासाठी ड्रायव्हरवर दबाव टाकल्याप्रकरणी व त्याला डांबून ठेवल्याप्रकरणी सुंरेंद्र कुमारवर ही कारवाई करण्यात आली होती. यानंतर आज झालेल्या सुनावणीत अग्रवाल पिता-पुत्राला आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघेही आता ३१ मे पर्यंत पोलीस कोठडीत असणार आहेत.


पोर्शे कार अपघात प्रकरणी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं होतं. ड्रायव्हरचं अपहरण, मुलाचा गुन्हा स्वतःवर घ्यावा, आणि तसं न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी झाली. आजोबा सुरेंद्रकुमार आधी अटकेत होते, विशाल अग्रवालला याप्रकरणी आज अटक करण्यात आलेली आहे.


कोर्टामध्ये दोन्ही पक्षाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद झाला. सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यामध्ये खडाजंगी झाली. सरकारी वकिलांनी दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आरोपी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.



ससूनमधील दोन डॉक्टरांनाही अटक


कल्याणीनगर येथील अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायालाही अटक करण्यात आली आहे. त्यांनी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सँपलमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी कोर्टाने डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या