
मुंबई: जगभरात कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांची कपात सुरू आहे. याचा परिणाम भारतातही पाहायला मिळत आहे. आयसी सेक्टर कंपन्यांवर कंपन्यांच्या कपातीचा मोठा परिणाम होत आहे. एआय टेक्नॉलॉजीचा वाईट परिणाम कंपन्यांवर होत आहे. कर्मचाऱ्यांवर शंकाचे मोठे ढग घोंघावत आहेत.
यातच देशातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. इन्फोसिस कंपनीचे सीईओ सलील पारेख यांनी कपात आणि जॉब्सवर आपल्या कंपनीचा हेतू स्पष्ट केला आहे. ते म्हणाले की इन्फोसिसमध्ये कोणतीही कपात होणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार इन्फोसिसमध्ये नोकऱ्यांमध्ये कपातीची कोणतीही योजना नाही बनत आहे. आम्ही एआयमुळे कोणालाही नोकरीवरून काढणार नाही. सलील पारेख म्हणाले, इंडस्ट्रीमध्ये अनेक कंपन्या अशी पावले उचलत आहेत. दरम्यान, आमचा विचार स्पष्ट आहे. आयटी इंडस्ट्रीमध्ये अनेक कंपन्यांनी एआयचा वापर करताना मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली आहे.
सीईओचे म्हणणे आहे की मोठ्या कंपन्यांमद्ये अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजी एकत्र काम करू शकतात. येणाऱ्या वर्षांमध्ये इन्फोसिस जेनेरिक एआयमध्ये हायरिंग आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून स्किल्स डेव्हलप करत राहणार. यामुळे इन्फोसिस जगातील कंपन्यांप्रमाणेच प्रत्येक मागणी पूर्ण करण्यात सक्षम होईल. टेक्नॉलॉजीचा विकास हा नोकऱ्या संपवण्याऐवजी नव्या संधी निर्माण करेल.