Dombivali MIDC Fire :डोंबिवली एमआयडीसीमधील भीषण स्फोट; मृतांचा आकडा वाढला!

११ जणांनी गमावले प्राण, ६०हून अधिक जखमी


डोंबिवली : एमआयडीसीमधील अमुदान नावाच्या केमिकल कंपनीत काल झालेल्या स्फोटामुळे डोंबिवली शहर हादरले आहे. कालपासून या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ तसेच अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्न सुरू आहेत. या बचावकार्यादरम्यान मृतांचा आकडा वाढत असल्याची माहिती मिळत आहे. सध्या या मृतांचा आकडा ११ वर पोहोचला असून ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी दोन वाजता डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत भीषण स्फोट झाला. ही दुर्घटना इतकी भयंकर होती की परिसरातील २ ते ३ किमीपर्यंतच्या इमारतींच्या काचा फुटल्या तसेच हादरेही बसले. या दुर्घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल तसेच एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरू होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले होते. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. आज सकाळी या सर्च ऑपरेशन दरम्यान आणखी तीन मृतदेह सापडल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता ११ वर पोहोचला आहे.


दरम्यान, या दुर्घटनेत अजूनही काही कामगार अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनीतील कामगारांच्या नातेवाईकांनी परिसरात मोठी गर्दी केली असून मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अद्यापही शोधकार्य सुरू असून संबंधित कंपनीचे मालक प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे