पाचव्या टप्प्याच्या मतदानानंतर भाजप जिंकलीय ३१० जागा

Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मोठा दावा

ओडिशा : देशात २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठाच दावा केला आहे. ते म्हणाले, ‘पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपला आधीच ३१० जागा मिळाल्या आहेत.

ओडिशमध्ये आयोजित एका प्रचार सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी हा दावा केला आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपला आधीच ३१० जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीचे देशात आणखी दोन टप्पे शिल्लक असून सहाव्या आणि सातव्या फेरीच्या मतदानानंतर आम्हाला ४०० हून अधिक जागा मिळतील, असेही शहा यांनी म्हटले आहे.

दरम्यान सभेला संबोधित करताना शाह म्हणाले की, यावेळी ओडिशात कमळ फुलणार आहे. भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना संबलपूरमधून उमेदवारी दिली आहे.

राज्यात (ओडिशात ) मूठभर अधिकाऱ्यांची सत्ता असल्याचा आरोप अमित शहा यांनी यावेळी केला. या निवडणुकीमुळे राज्यातील सध्याचे बाबूराज संपणार असल्याचे ते म्हणाले, देशातील बहुतांश खाणी आणि खनिज साठे केओंझार जिल्ह्यात असूनही येथील आदिवासींना कोणताही लाभ मिळालेला नाही.

या पूर्वीच्या केंद्रातील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले की, ‘काँग्रेसने आदिवासींसाठी काहीही केले नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आदिवासीची प्रकरणे हाताळण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले होते, तर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात नक्षलवाद संपवण्याचे काम केले आहे.
‘‘मोदींनी डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशन स्थापन करून आदिवासी भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये दिल्याचे सांगुन शहा म्हणाले, मोदी सरकारच्या काळात आदिवासींसाठी अर्थसंकल्पीय तरतूद १.२५ लाख कोटी रुपये करण्यात आली होती. तर आधीच्या यूपीए सरकारच्या काळात फक्त २५ हजार कोटी रुपये इतकीच तरतूद होती.‘

Recent Posts

Crime : दिल्ली हत्याकांडाची पुनरावृत्ती! सततच्या वादाला कंटाळून प्रियकराकडून प्रेयसीचा खून

धारदार शस्त्राने वार करत मृतदेहाचे तुकडे केले अन्... मुजफ्फरनगर : दोन वर्षांपूर्वी दिल्लीत (Delhi Murder…

13 mins ago

Nashik accident : मद्यधुंद अवस्थेत कारला तर ठोकलंच पण नागरिकांवरही केली गुंडगिरी!

बहिण पोलीस दलात असल्याचे सांगत नाशिकच्या तरुणाचा पराक्रम नाशिक : राज्यात दिवसेंदिवस अपघातांच्या घटना वाढताना…

35 mins ago

Accident: कर्नाटकात भीषण रस्ते अपघात, उभ्या असलेल्या लॉरीला ट्रॅव्हलरची धडक, १३ जणांचा मृत्यू

मुंबई: कर्नाटकमध्ये(karnataka) शुक्रवारी भीषण रस्ते अपघाताची(road accident) घटना घडली आहे. राज्याच्या हावेरी जिल्ह्यात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय…

2 hours ago

फायनलमध्ये पोहोचताच रडायला लागला रोहित शर्मा, पाहा Video

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने(indian cricket team) आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) स्थान मिळवले…

3 hours ago

Delhi: दिल्ली एअरपोर्टवर मोठा अपघात, छत कोसळल्याने ४ जण जखमी

नवी दिल्ली: दिल्ली एअरपोर्ट(delhi airport) टर्मिनल १वर छत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी…

4 hours ago

Rohit Sharma: इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रोहित शर्माने रचला इतिहास, असे कऱणारा पहिला भारतीय कर्णधार

मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये २७ जूनला भारताचा सामना…

5 hours ago