Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची धडक कारवाई! सीक लिव्ह घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

मुंबई : एअर इंडिया एक्सप्रेसमधील (Air India Express) क्रू मेंबर्सनी अचानक एकाच दिवशी सामूहिक रजा घेतल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. त्यामुळे हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी आजारपणाचे कारण देत सुट्टी घेतल्याने विमानसेवा पुरवणाऱ्या या कंपनीचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलं. त्याचबरोबर कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे या सीक लिव्ह (Sick leave) घेणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे.


एअर इंडिया एक्सप्रेस च्या जवळपास २०० कर्मचाऱ्यांनी अचानक सीक लिव्हचं कारण देत सुट्टी घेतल्यामुळे ७० उड्डाणं रद्द करण्यात आली होती. वरिष्ठ क्रू मेंबर्सच्या अशा वर्तवणुकीमुळे एअर इंडियाने या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. एअर इंडिया एक्सप्रेसकडून जवळपास २५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. कंपनीच्या या धडक कारवाईनं कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे. एअरलाइन्सशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे त्या कर्मचाऱ्यांनी तक्रार केली नाही आणि त्यांचे वर्तनही चांगले नव्हते.


दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी आज टाऊन हॉल मीटिंग बोलावली असून या माध्यमातून आपल्या समस्या उघडपणे मांडण्यासंबंधीच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा विचार करुन कर्मचाऱ्यांनी नोकरीवर रुजू व्हावं असा इशाराही कंपनीकडून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Madhya Pradesh: अनुपपूरमध्ये मोठा अपघात; तीन मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील अनुपपूर येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. तीन मजली इमारत अचानक कोसळली. या घटनेत एका

Uttar Pradesh: मेड असल्याचे सांगत महिलेने केले घर साफ; स्त्रीला बेशुद्ध करून...

उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडातील एका सोसायटीत वृद्ध महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्या घरात चोरी करण्यात आली.

Iranian crude oil : इराणी कच्च्या तेलाचा कार्गो चीनकडे वळवला गेल्याच्या बातम्या तथ्यात्मकदृष्ट्या चुकीच्या, सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इराणी कच्च्या तेलाचा एक कार्गो पेमेंटशी संबंधित अडचणींमुळे गुजरातमधील वाडीनार

Green Sanvi Vessel: ग्रीन सान्वी जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणत असलेला एलपीजी गॅस किती दिवस पुरेल?

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील पुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

बाजारात बनावट आंब्यांचा सुळसुळाट; तब्बल २०० किलो बनावट आंबे जप्त

हैद्राबाद : उन्हाळा सुरु झाला की स्वागत केलं जात ते फळांचा राजा आंब्याचं, कारण वर्षभरातून फक्त उन्हळ्यातच

Air India Airlines : एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची पश्चिम आशियातून ४२ विमानसेवा सुरु होणार

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या पश्चिम