Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची धडक कारवाई! सीक लिव्ह घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

मुंबई : एअर इंडिया एक्सप्रेसमधील (Air India Express) क्रू मेंबर्सनी अचानक एकाच दिवशी सामूहिक रजा घेतल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. त्यामुळे हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी आजारपणाचे कारण देत सुट्टी घेतल्याने विमानसेवा पुरवणाऱ्या या कंपनीचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलं. त्याचबरोबर कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे या सीक लिव्ह (Sick leave) घेणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे.


एअर इंडिया एक्सप्रेस च्या जवळपास २०० कर्मचाऱ्यांनी अचानक सीक लिव्हचं कारण देत सुट्टी घेतल्यामुळे ७० उड्डाणं रद्द करण्यात आली होती. वरिष्ठ क्रू मेंबर्सच्या अशा वर्तवणुकीमुळे एअर इंडियाने या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. एअर इंडिया एक्सप्रेसकडून जवळपास २५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. कंपनीच्या या धडक कारवाईनं कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे. एअरलाइन्सशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे त्या कर्मचाऱ्यांनी तक्रार केली नाही आणि त्यांचे वर्तनही चांगले नव्हते.


दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी आज टाऊन हॉल मीटिंग बोलावली असून या माध्यमातून आपल्या समस्या उघडपणे मांडण्यासंबंधीच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा विचार करुन कर्मचाऱ्यांनी नोकरीवर रुजू व्हावं असा इशाराही कंपनीकडून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च