पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मतदारांचा पार गोंधळ उडवून टाकला आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आहेत. त्यामुळे एकाच पक्षाला ठरवून मतदान करणारे पारंपरिक मतदार पुरते गोंधळले आहेत. अशीच एक घटना आज बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघात घडली. या ठिकाणी एक मतदार आजोबा ईव्हीएमवर (EVM) कमळ फुलाचं चिन्ह न दिसल्याने चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.
त्याचं झालं असं की, बारामतीची जागा ही महायुतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला देण्यात आली व त्यांनी या ठिकाणी आपल्या पत्नीला म्हणजेच सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्यात आली व सुप्रिया सुळे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी चुरशीची लढत आहे. त्यात सुनेत्रा पवार या ‘घड्याळ’ चिन्हावर तर सुप्रिया सुळे या ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
अजितदादांच्या राष्ट्रवादीची भाजपसोबत युती असल्याने या ठिकाणी ईव्हीएमवर कमळाचे चिन्ह नाही. मात्र, पारपंरिकरित्या कमळाला मतदान करत आलेल्या मतदारांचा यामुळे गोंधळ उडाला. पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेत एका मतदार आजोबांनी कमळ दिसत नसल्याने आपला संताप व्यक्त केला.
आजोबा म्हणाले, EVM वर कमळ फूल नाही. कमळ हे चिन्हच नाही. उमेदवार नाही तर त्याला आम्ही काय करणार? कमळाचं चिन्ह नाही तर आम्ही कसं मतदान करणार? मतदान करायचे आहे पण कमळ फूल कुठे आहे, असं आजोबा म्हणाले. कमळाचं चिन्ह नसल्याने आजोबांनी मतदान न करण्याचा निर्धार केला. या सर्व प्रकारामुळे काही वेळ मतदान केंद्रावर गोंधळ झाला. मात्र या आजोबांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेत मतदान केले.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…