Baramati Loksabha : EVM वर कमळाचं फूल नाही तर मतदान कसं करायचं?

  57

पुण्यातील मतदार आजोबा संतापले


पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मतदारांचा पार गोंधळ उडवून टाकला आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आहेत. त्यामुळे एकाच पक्षाला ठरवून मतदान करणारे पारंपरिक मतदार पुरते गोंधळले आहेत. अशीच एक घटना आज बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघात घडली. या ठिकाणी एक मतदार आजोबा ईव्हीएमवर (EVM) कमळ फुलाचं चिन्ह न दिसल्याने चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.


त्याचं झालं असं की, बारामतीची जागा ही महायुतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला देण्यात आली व त्यांनी या ठिकाणी आपल्या पत्नीला म्हणजेच सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्यात आली व सुप्रिया सुळे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी चुरशीची लढत आहे. त्यात सुनेत्रा पवार या 'घड्याळ' चिन्हावर तर सुप्रिया सुळे या 'तुतारी फुंकणारा माणूस' या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.


अजितदादांच्या राष्ट्रवादीची भाजपसोबत युती असल्याने या ठिकाणी ईव्हीएमवर कमळाचे चिन्ह नाही. मात्र, पारपंरिकरित्या कमळाला मतदान करत आलेल्या मतदारांचा यामुळे गोंधळ उडाला. पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेत एका मतदार आजोबांनी कमळ दिसत नसल्याने आपला संताप व्यक्त केला.


आजोबा म्हणाले, EVM वर कमळ फूल नाही. कमळ हे चिन्हच नाही. उमेदवार नाही तर त्याला आम्ही काय करणार? कमळाचं चिन्ह नाही तर आम्ही कसं मतदान करणार? मतदान करायचे आहे पण कमळ फूल कुठे आहे, असं आजोबा म्हणाले. कमळाचं चिन्ह नसल्याने आजोबांनी मतदान न करण्याचा निर्धार केला. या सर्व प्रकारामुळे काही वेळ मतदान केंद्रावर गोंधळ झाला. मात्र या आजोबांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेत मतदान केले.


Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती