Health Insurance : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! विमाधारकांना मिळणार दिलासा

आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करणार


मुंबई : देशभरात एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी तर दुसरीकडे महागाईची झळ सुरु आहे. अशातच ग्राहकांना एक आनंदाची बातमी मिळत आहे. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून याचा ग्राहकांचा चांगलाच फायदा होणार आहे. आरोग्य विमा अधिक परवडणारा आणि आकर्षक बनवण्याच्या उद्दिष्ट्याने केंद्र सरकार आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे तुम्ही जर आरोग्य विमा पॉलिसी घेतली असेल किंवा येत्या काही दिवसांत ती खरेदी करणार असाल तर तुम्हाला या गोष्टीचा अधिक फायदा होणार आहे.


एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार ३०,००० रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करत आहे. सध्याच्या १८ टक्के जीएसटी दरावरून १२ टक्के करणार असून आरोग्य विमा पॉलिसीमध्ये कुटुंबातील चार सदस्यांना १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळू शकते असे सांगितले आहे.


अर्थविषयक संसदीय स्थायी समितीने फेब्रुवारी महिन्यात विम्यावरील १८ टक्के जीएसटीचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. आरोग्य विमा परवडणारा बनवण्यासाठी, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी किरकोळ विमा पॉलिसी आणि मुदतीच्या पॉलिसींवरील जीएसटी कमी करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे समितीने म्हटले होते.


दरम्यान, देशात जीएसटी लागू होत असताना, कोणत्याही व्यक्तीने आरोग्य विमा पॉलिसी घेतल्यास त्याला १८ टक्के जीएसटी भरावा लागेल, असा निर्णय घेण्यात आला होता. जीएसटीच्या आधीच्या काळातील १५ टक्के सेवा कराच्या तुलनेत हा दर तीन टक्के अधिक होता. आयकराच्या कलम 80D च्या नियमांनुसार, आरोग्य विमा प्रीमियमवर कर कपातीचा लाभ उपलब्ध आहे. या प्रलंबित प्रस्तावावर लोकसभा निवडणूक २०२४ पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेतला जाऊ शकतो, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या