Nashik Loksabha : नाशिकची जागाही शिंदेंकडेच! हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर

महायुतीच्या पत्रकार परिषदेत केली घोषणा


नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये (Mahayuti) नाशिकच्या जागेवरुन (Nashik Loksabha) मतभेद होत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व भाजपा (BJP) हे तिन्ही पक्ष या जागेवर आपापला दावा सांगत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आपण लोकसभेतून माघार घेत असल्याचे राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीर केले. त्यानंतर अखेर ही जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. नाशिक येथे महायुतीच्या एकत्र पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.


शिवसेनेकडून आज सकाळीच ठाणे व कल्याण या जागांवरही उमेदवार जाहीर करण्यात आले. ठाणे लोकसभेतून नरेश म्हस्के तर कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, नाशिकचा प्रश्न सुटला नव्हता. आज पत्रकार परिषद घेऊन नाशिकबाबतही महायुतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. हेमंत गोडसे यांना महायुतीकडून उमेदवार करण्यात आलं आहे. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी हेमंत गोडसे यांचा सत्कार केला.





हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. शिवाय महायुतीमधील सर्व नेते पाठिशी राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचे स्वागत केले.

Comments
Add Comment

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक