Nashik Loksabha : नाशिकची जागाही शिंदेंकडेच! हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर

महायुतीच्या पत्रकार परिषदेत केली घोषणा


नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये (Mahayuti) नाशिकच्या जागेवरुन (Nashik Loksabha) मतभेद होत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व भाजपा (BJP) हे तिन्ही पक्ष या जागेवर आपापला दावा सांगत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आपण लोकसभेतून माघार घेत असल्याचे राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीर केले. त्यानंतर अखेर ही जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. नाशिक येथे महायुतीच्या एकत्र पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.


शिवसेनेकडून आज सकाळीच ठाणे व कल्याण या जागांवरही उमेदवार जाहीर करण्यात आले. ठाणे लोकसभेतून नरेश म्हस्के तर कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, नाशिकचा प्रश्न सुटला नव्हता. आज पत्रकार परिषद घेऊन नाशिकबाबतही महायुतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. हेमंत गोडसे यांना महायुतीकडून उमेदवार करण्यात आलं आहे. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी हेमंत गोडसे यांचा सत्कार केला.





हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. शिवाय महायुतीमधील सर्व नेते पाठिशी राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचे स्वागत केले.

Comments
Add Comment

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे