ST Ticket Price Hike: लालपरीचा प्रवास महागणार! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

'इतक्या' टक्क्यांनी होणार तिकीट दरवाढ


मुंबई : महागाईने आधीच त्रस्त असणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी झळ सोसावी लागणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटी. देशभरातील अनेक लोक उन्हाळी सुट्ट्यांसाठी, देवदर्शनासाठी, गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जात असतात. बहुतेकदा अनेकजण खिशाला परवडणाऱ्या प्रवासाकरिता लालपरीने प्रवास करतात. आता याच लालपरीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.



इतके वाढणार तिकीट दर


सुट्टीच्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामी काळात बसच्या तिकीट दरात १० टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ही हंगामी तिकीट दरवाढ असणार आहे. म्हणजेच, तिकीट दर वाढ केवळ एप्रिल ते १५ जूनपर्यंत असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्ववत केले जाणार, असे सांगण्यात आले आहे. तसेच सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती मिळत आहे.



उन्हाळी सुट्टीसाठी धावणार विशेष गाड्या


राज्यातील सर्वात कठीण मार्गांवर आणि प्रादेशिक स्तरावर स्थलांतरितांच्या मागणीनुसार विशेष गाड्या चालवल्या जातील. गर्दीच्या मार्गांवर मध्यवर्ती कार्यालयातून ४९६ गाड्या चालवण्यात येणार आहेत. मुंबईत २११, पुण्यात ३३२, छत्रपती संभाजीनगरमध्ये २४९, नाशिकमध्ये १९९, अमरावतीमध्ये ५१ आणि नागपूरात ४६ विशेष गाड्या धावत आहेत. प्रत्येक विशेष ट्रेन सरासरी ४५० किलोमीटर अंतराचा प्रवास करेल, असे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक