Nitin Gadkari : ज्यांना मदत केली ते आज माझ्याविरोधात प्रचार करत आहेत

  55

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य


नागपूर : नागपूर लोकसभा (Nagpur Loksabha) मतदार संघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज पत्रकार परिषदेत वचननामा ते वचनपूर्ती हा जाहीरनामा जाहीर केला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या (Congress) काही नेत्यांबाबत वक्तव्य केलं. 'अनेक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्याकडे त्यांच्या कामासाठी आले आहेत परंतु ते आज माझ्या विरोधात प्रचार करत आहेत' मात्र, याबद्दल कुठलाही आक्षेप नसल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.


गेल्या दहा वर्षांत नागपूर शहरात केलेली विकास कामे आणि पुढील पाच वर्षात शहराच्या विकासासाठी कुठली विकास कामे केली जाणार आहे याचा आलेख मांडताना गडकरी म्हणाले, गेल्या पंधरा वीस दिवसांपासून शहरातील विविध भागात प्रचार सुरू असताना लोकांचा प्रतिसाद मिळतो. मात्र, माझ्यासोबत काम करणारे किंवा ज्यांना मी अनेक कामात मदत केली आहे असे अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते व नेते माझ्या विरोधात प्रचार करत आहेत.


शहरात दोन तीन दिवसापूर्वी एक पदाधिकारी विरोधात फिरत होते, जे तुरुंगात जाण्याच्या स्थितीत होते. त्यांना अटक होण्यापासून मी वाचवले आहे. मात्र, ते आज विरोधात प्रचार करत आहेत. त्याला माझा काही आक्षेप नसून मी विरोधात असलेल्यांचीही कामं केली आहेत. मी कधीही जातीभेद किंवा पक्षभेद केला नाही. जो माझ्याकडे आला आहे त्याचं काम केलं, असंही गडकरी म्हणाले.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या