Thackeray Vs Shinde : जळगावात ठाकरे गटाला भगदाड! पदाधिकाऱ्यांसह ४०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचाही समावेश


जळगाव : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गटाला (Thackeray Group) मात्र धक्क्यांवर धक्के सहन करावे लागत आहेत. शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यापासून कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडे वाढता ओघ अजूनही सुरुच आहे. त्यामुळे ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबायचे नाव घेत नाही. त्यातच आता ठाकरे गटाला जळगावातही (Jalgaon News) मोठं भगदाड पडलं आहे. जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह ४०० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत काल रात्री हा पक्षप्रवेश पार पडला.


जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व चोपडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील जवळपास ४०० कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा शिवसेनेत प्रवेश केला. बुलढाणा येथील बुलढाणा रेसिडेन्सी क्लब येथे हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, बुलढण्याचे खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते. हे सर्व कार्यकर्ते जवळपास ६० ते ७० वाहनांतून बुलढाण्यात पोहोचले होते.



शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही निवडणुकीत गुंतलो असलो तरी मी दररोज सकाळी माहिती घेतो. त्याप्रमाणे मी मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतो. त्यांना सूचना देतो की, तात्काळ पंचनामे करा हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागरूक आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना नुकसान भरपाई मिळेल.


Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे