BJP Candidates : भाजपचा सातार्‍यातील उमेदवार ठरला! 'यांच्या' नावावर केले शिक्कामोर्तब

  1337

आज घोषणा होण्याची शक्यता


सातारा : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सातारा मतदारसंघातील (Satara Loksabha) उमेदवारीचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. भाजपने या ठिकाणी आपला उमेदवार ठरवला आहे. आजच सातार्‍याच्या जागेवर भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या (Udayanraje Bhosale) नावाची घोषणा होऊ शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पत्रकार परिषदेतच ही घोषणा केली जाईल, अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे साताऱ्याची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी केली आहे.


महायुतीत साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा अजूनही कायम आहे. एकीकडे, ही जागा भाजपकडे जाईल आणि उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे, मात्र दुसरीकडे, राष्ट्रवादीचा दावा कायम आहे. तर आजच सातारच्या जागेवर भाजपकडून उदयन राजेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.



उदयनराजेंचा प्रचार सुरुच


सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम असताना उदयनराजेंनी नाव जाहीर होण्याची वाट न बघता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे. त्यांनी काल महाबळेश्वर, पाचगणीचा दौरा केल्यानंतर मतदारसंघात भेटीगाठींचा सिलसिला सुरुच ठेवला आहे.



आज सातारा जाहीर करून नाशिकचे नंतर बघू


नाशिक लोकसभा मतदारसंघ देणार असाल तर साताऱ्याची जागा भाजपला सोडू अशी भूमिका अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही न सुटल्याने सातारा जागा देखील जाहीर झाली नव्हती. मात्र आज सातारा जाहीर करून नाशिकचे नंतर बघू, असा विचार करून उदयन राजे यांचे नाव जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम