Girish Mahajan : तुमच्या काळात गृहखात्याचा सर्रास लिलाव; त्यामुळे दीड वर्ष गृहमंत्री जेलमध्ये!

  52

सुप्रिया सुळेंच्या टीकेला गिरीश महाजन यांचं चोख प्रत्युत्तर


उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडत चाललंय; ठाकरेंनाही लगावला टोला


मुंबई : बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील (Mumbai) घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना आज पहाटे घडली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. गोळीबार प्रकरणावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. आता सुप्रिया सुळेंच्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.


सुप्रिया सुळे यांना उद्देशून गिरीश महाजन म्हणाले, 'या घटनेवरून काही जण राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहेत. आपल्या सरकारच्या काळात तर गृह खात्याचा सर्रास लिलाव सुरू होता. त्यामुळे दीड वर्ष तुमच्या गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं, असा थेट हल्लाबोल गिरीश महाजन यांनी सुप्रिया सुळेंवर केला.



उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडत चाललंय


खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना नकली आहे. मात्र याचा राग येऊन उद्धव ठाकरे यांनी भाजपबाबत जे आक्षेपार्ह विधान केले यावरून उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले असल्याचा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यावरून राजकारणाचा स्तर किती खाली चालला असून आज जर ही उद्धव ठाकरेंची परिस्थिती असेल तर उद्या निकाल लागल्यावर काय होईल असा चिमटाही गिरीश महाजन यांनी काढला आहे.


दरम्यान, सलमान खान याच्या घरासमोर झालेल्या गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नसून या घटनेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री हे स्वतः लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.


Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून