School Bus accident : स्कूलबस उलटल्याने झाला भीषण अपघात! ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर १५ जण जखमी

४० विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती स्कूलबस


महेंद्रगड : गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या घटनांमध्ये (Accident News) प्रचंड वाढ झाली आहे. हरयाणाच्या (Haryana) महेंद्रगड येथून एक अशीच अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास महेंद्रगडच्या उन्हानी गावात ४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली स्कूलबस उलटल्याने भीषण अपघात (School Bus accident) झाला. यामध्ये ६ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १५ विद्यार्थी जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बसला सरळ केलं. हा अपघात कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, इदची शासकीय सुट्टी असूनही महेंद्रगडची जीएल पब्लिक स्कूल आज सुरु होती. ही मुलं स्कूलबसमधून शाळेत जात होती. ही बस उन्हानी गावात पोहोचताच उलटली. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच विद्यार्थ्यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता, तर एकाची प्रकृती गंभीर होती. त्याला रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं मात्र काहीच वेळात त्याचाही मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.


घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि विद्यार्थ्यांचे पालक घटनास्थळी पोहोचले. सध्या रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. उपचार ही प्राथमिकता असून त्यानंतर या घटनेचा संपूर्ण तपास केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

Comments
Add Comment

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न