School Bus accident : स्कूलबस उलटल्याने झाला भीषण अपघात! ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर १५ जण जखमी

४० विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती स्कूलबस


महेंद्रगड : गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या घटनांमध्ये (Accident News) प्रचंड वाढ झाली आहे. हरयाणाच्या (Haryana) महेंद्रगड येथून एक अशीच अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास महेंद्रगडच्या उन्हानी गावात ४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली स्कूलबस उलटल्याने भीषण अपघात (School Bus accident) झाला. यामध्ये ६ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १५ विद्यार्थी जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बसला सरळ केलं. हा अपघात कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, इदची शासकीय सुट्टी असूनही महेंद्रगडची जीएल पब्लिक स्कूल आज सुरु होती. ही मुलं स्कूलबसमधून शाळेत जात होती. ही बस उन्हानी गावात पोहोचताच उलटली. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच विद्यार्थ्यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता, तर एकाची प्रकृती गंभीर होती. त्याला रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं मात्र काहीच वेळात त्याचाही मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.


घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि विद्यार्थ्यांचे पालक घटनास्थळी पोहोचले. सध्या रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. उपचार ही प्राथमिकता असून त्यानंतर या घटनेचा संपूर्ण तपास केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

Comments
Add Comment

जवाद सिद्दिकीला १३ दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली :  दिल्लीतील एका न्यायालयाने बुधवारी अल फलाह विद्यापीठाचे प्रमुख व संस्थापक जवाद अहमद सिद्दिकी यांना

नितीश कुमार यांचा आज शपथविधी

दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचेच नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल संयुक्त (जेडीयू) आणि भाजपने

निवडणुकीवर संकट?

आरक्षण मर्यादा प्रकरणी २५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी नवी दिल्ली : राज्यात सध्या सुरू

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini