मुंबई : चैत्र पाडव्याला आपण घरोघरी गुढी उभारुन मराठी नववर्षाला मोठ्या उत्साहात सुरुवात करतो. यावेळी पुरणपोळीचा बेत आखला जातो. त्यासोबतच कडुलिंबाच्या पानाचाही नैवेद्य दाखवला जातो. कडुलिंबाची पाने आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचे सेवन केले जाते. मात्र सायंकाळी गुढी उतरवल्यानंतर कडुलिंबाचा पाला फेकून न देता त्याचा ‘असा’ वापर तुम्ही करु शकता. (Neem Leaves Uses)
‘वर्षाची सुरुवात कडू झाली तरीही शेवट मात्र गोड व्हावा’ या संदेशामार्फत गुढीपाडव्याच्या नैवेद्यातून कडुलिंबाची कोवळी पाने, गूळ, साखर, जिरे, मिरे, हरभऱ्याची डाळ, ओवा, हिंग, धने, मीठ यांचे मिश्रण करुन प्रत्येकाला प्रसाद म्हणून खायला देतात. यामुळे शरीर तेजस्वी व निरोगी बनते तसेच दुर्धर व्याधी दूर होतात.
कडुलिंबाची पाने आरोग्यासाठी उपयुक्त असतात, आजार कित्येक मात्र उपाय एक म्हणून कडुलिंबांच्या पानांचा वापर केला जातो. शरीरासाठी गुणकारक असणाऱ्या कडुलिंबाच्या पानांचा प्रसादही बनवला जाऊ शकतो. हरभरा डाळ ४-५ तास स्वच्छ पाण्यात भिजत ठेवावी. नंतर कडुलिंबाचा पाला स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात हरभरा डाळ, कडुलिंबाची पाने, जिरे, ओवा, वाळलेलं खोबरे, गुळ किंवा साखर आणि चिंच एकत्र करुन बारीक करुन घ्यावे. मिश्रण तयार झाल्यानंतर आवडीनुसार मध घालून कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद तयार होतो.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…