Maha Vikas Aghadi : सांगली आणि भिवंडीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी

मविआमध्ये काँग्रेसची शक्ती पडतेय कमी?


मुंबई : सध्या देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) धुरळा उडत आहे. प्रत्येकजण आपपल्या पक्षाच्या प्रचारासाठी कंबर कसून मेहनत घेत आहे. मात्र, महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सांगली (Sangli Lok Sabha Election) आणि भिवंडीच्या (Bhiwandi Lok Sabha Election) जागेवरून महाविकास आघाडीत मोठी तेढ निर्माण झाली आहे. दोन्ही काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ असताना त्यावरती ठाकरे गट आणि शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस आता बॅकफूटवर जाताना पाहायला मिळत आहे.


सांगली लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि सर्वच पक्षांच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. यासाठी सुरुवातीपासूनच काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून तयारीला सुरुवात केली. मात्र महाराष्ट्रातील सांगली आणि भिवंडीच्या जागेने महाविकास आघाडीत बिघाडी करायला सुरुवात केली आहे. कारण सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरे गटाने तर भिवंडीच्या जागेवर शरद पवार गटाने दावा केल्यामुळे काँग्रेसची शक्ती कमी पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये कमालीची उदासिनता आहे.



काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी


या दोन्ही जागांवरती काँग्रेसचा दावा कायम असताना ठाकरे आणि पवारांनी परस्पर या जागांची घोषणा केल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजीचा सुरू आहे. त्यामुळे बंडखोरीची शक्यता टाळता येत नाही. यावरून स्पष्ट होतंय की जागा वाटपाच्या वाटाघाटीत कुठेतरी काँग्रेसचे नेते कमी पडले आणि त्यामुळे काँग्रेस आज महाविकास आघाडीमध्ये बॅकफूटवर जाताना पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०