Maha Vikas Aghadi : सांगली आणि भिवंडीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी

  95

मविआमध्ये काँग्रेसची शक्ती पडतेय कमी?


मुंबई : सध्या देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) धुरळा उडत आहे. प्रत्येकजण आपपल्या पक्षाच्या प्रचारासाठी कंबर कसून मेहनत घेत आहे. मात्र, महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सांगली (Sangli Lok Sabha Election) आणि भिवंडीच्या (Bhiwandi Lok Sabha Election) जागेवरून महाविकास आघाडीत मोठी तेढ निर्माण झाली आहे. दोन्ही काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ असताना त्यावरती ठाकरे गट आणि शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस आता बॅकफूटवर जाताना पाहायला मिळत आहे.


सांगली लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि सर्वच पक्षांच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. यासाठी सुरुवातीपासूनच काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून तयारीला सुरुवात केली. मात्र महाराष्ट्रातील सांगली आणि भिवंडीच्या जागेने महाविकास आघाडीत बिघाडी करायला सुरुवात केली आहे. कारण सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरे गटाने तर भिवंडीच्या जागेवर शरद पवार गटाने दावा केल्यामुळे काँग्रेसची शक्ती कमी पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये कमालीची उदासिनता आहे.



काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी


या दोन्ही जागांवरती काँग्रेसचा दावा कायम असताना ठाकरे आणि पवारांनी परस्पर या जागांची घोषणा केल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजीचा सुरू आहे. त्यामुळे बंडखोरीची शक्यता टाळता येत नाही. यावरून स्पष्ट होतंय की जागा वाटपाच्या वाटाघाटीत कुठेतरी काँग्रेसचे नेते कमी पडले आणि त्यामुळे काँग्रेस आज महाविकास आघाडीमध्ये बॅकफूटवर जाताना पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी अतिरिक्त आरक्षण खिडक्या

प्रवासी संघटनेने खा. नरेश म्हस्के यांचे मानले आभार ठाणे : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास

Weather Update: कसं असेल पुढील चार आठवडे राज्याचे हवामान? घ्या जाणून

मुंबई : हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांतील महाराष्ट्रामधील हवामानाचा विस्तृत अंदाज जाहीर केला आहे. हवामान

Mumbai train robbery: मुंबईत ट्रेनमध्ये लूटमारीचा थरार! पत्नीला वाचवताना डॉक्टरने हात गमावला!

मुंबई : मुंबईहून लातूरकडे जाणाऱ्या एलटीटी-नांदेड एक्स्प्रेसमधील एक घटना बुधवारी पहाटे कांजुरमार्ग स्टेशनच्या

डिनो मोरियाच्या घरी ईडीची छापेमारी, मातोश्रीत टेन्शन, आदित्य अडकणार? उद्धव गटाचे धाबे दणाणले!

मुंबई : ६५ कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याचा तपास करताना आज ईडीने बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाच्या

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: रेपो दराचा बाजारात बोलबाला सेन्सेक्स ७४६ व निफ्टी २५२ अंशाने वधारला

मोहित सोमण: आज शेअर बाजाराची अखेर दणदणीत झाली आहे. बाजार गिफ्ट निफ्टीच्या संकेतानंतर रूक्ष होईल का ही चिंता

प्रहार आरबीआय रेपो दर विश्लेषण: रेपो दर घटला पण अर्थव्यवस्थेचे काय ? वाचा अर्थतज्ज्ञांची मते.....

प्रतिनिधी: आज रेपो दरात घट झाल्यानंतर बाजाराने उत्सव साजरा केला. विशेषतः रेपो दरात ०.५० टक्के अनपेक्षित कपात