ठाण्यात ऑनलाईन फ्रॉड करणारे तिघे अटकेत

स्वस्त कपड्यांच्या जाहिरातीतून फसवणुकीचा प्रकार


ठाणे : इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे स्वस्तात कपड्यांची जाहीरात करुन ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या तिघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत सुमारे १२०० जणांची आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या तिघांना २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


या प्रकरणी सुफीयान शफीक खान (२३) रा. जास्मीन पार्क मुंब्रा, फुरकान रिजवान खान (२०) रा. मुंब्रा आणि कामरान इस्माईल शेख (१९) रा. चारमीनार लॉन्स जवळ, मुंब्रा यांना अटक करण्यात आले आहे. २० मार्च रोजी मुंब्रा येथील एका व्यक्तीने परिमंडळ १ ठाणे कार्यालयात येऊन माहिती दिली होती. त्यानुसार काही इसम हे मागील दोन ते अडीच वर्षांपासून फेक इन्स्टाग्राम अकाऊंट बनवून त्याद्वारे कपड्यांची जाहीरात करीत आहेत. त्यांचे अकाऊंट वरील स्टेटस पाहिले असता ते ग्राहकांना कपडे आवडल्यास इन्स्टाग्रामवरील व्हॉट्सअॅप लिंक वर जाऊन त्यांना केवळ हाय असा मेसेज केल्यास ते तत्काळ प्रतिउत्तर देतात व त्यांच्याकडे मेसेजद्वारे त्याचे पूर्ण माहिती मागवतात. त्यामध्ये 'नो कॅश ऑन डिलीव्हरी' असे नमूद करून पुढील ७ ते १२ दिवसात बुकिंग केलेला माल न मिळाल्यास पैसे परत केले जातील, असे लिहून मेसेज फॉरवर्ड करतात. ग्राहक हे पैसे पाठवत होते. परंतु कपडे न मिळाल्याने फोन केल्यावर कोणताच प्रतिसाद मिळत नाही.


या फसवणुकीची माहिती मिळाल्यावर त्यांचे लोकेशन तपासून त्यांच्या मुंब्रा येथील राहत्या घरून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या मोबाइलमधील १ हजार ते १२०० नंबर ब्लॉक केल्याचे आढळून आले आहे. या कपडे विक्रीसाठी बँक अकाऊंट दुसऱ्याच व्यक्तीचा दिला जात होता. त्याच्या खात्यातून ते पैसे वळते करत असत, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. तर ब्लॉक केलेल्या यादीतील एक ग्राहकाकडे विचारणा केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्याने सांगितले. तर अशा प्रकारच्या ऑनलाईन अमिषांना बळी पडू नका, असे आवाहन परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली.


Comments
Add Comment

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी

Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट