LPG Cylinder: लोकसभा निवडणुकीआधी सामान्य नागरिकांना खुशखबर, कमी झाले एलपीजी सिलेंडरचे दर

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा सुरू होण्याआधीच सामान्य नागरिकांना आज मोठी खुशखबर मिळाली आहे. सरकारी तेल आणि गॅस विपणन कंपन्यांनी आज १ एप्रिलपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपातीची घोषणा केली आहे. यामुळे लोकांना दिलासा मिळणार आहे.



कमर्शियल सिलेंडरवर कपात लागू


सरकारे तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात ३०.५० रूपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे. दरम्यान, या कपातीचा लाभ केवळ १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरवर मिळेल. घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.



विविध शहरात आजपासून हे दर


ताज्या कपातीनंतर दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरचे दर कमी होऊन १,७६४.५० रूपये झालेत. याचपद्धतीने कोलकातामध्ये आजपासून कमर्शियल सिलेंडरचे दर १,८७९ रूपये असतील. मुंबईत हे दर १,७१७.५० रूपये झाले आहेत. तर चेन्नईत या सिलेंडरच्या दरात १९३० रूपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.



निवडणुकीआधी केली कपात


कमर्शियल सिलेंडरच्या दरातील ही कपात महत्त्वाची आहे कारण थोड्याच दिवसात मतदानाला सुरूवात होत आहे. सात टप्प्यात होणारी ही लोकसभा निवडणूक या महिन्यात सुरू होऊन जूनपर्यंत चालणार आहे.

Comments
Add Comment

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी