मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा सुरू होण्याआधीच सामान्य नागरिकांना आज मोठी खुशखबर मिळाली आहे. सरकारी तेल आणि गॅस विपणन कंपन्यांनी आज १ एप्रिलपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपातीची घोषणा केली आहे. यामुळे लोकांना दिलासा मिळणार आहे.
सरकारे तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात ३०.५० रूपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे. दरम्यान, या कपातीचा लाभ केवळ १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरवर मिळेल. घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
ताज्या कपातीनंतर दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरचे दर कमी होऊन १,७६४.५० रूपये झालेत. याचपद्धतीने कोलकातामध्ये आजपासून कमर्शियल सिलेंडरचे दर १,८७९ रूपये असतील. मुंबईत हे दर १,७१७.५० रूपये झाले आहेत. तर चेन्नईत या सिलेंडरच्या दरात १९३० रूपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.
कमर्शियल सिलेंडरच्या दरातील ही कपात महत्त्वाची आहे कारण थोड्याच दिवसात मतदानाला सुरूवात होत आहे. सात टप्प्यात होणारी ही लोकसभा निवडणूक या महिन्यात सुरू होऊन जूनपर्यंत चालणार आहे.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…