धक्कादायक! लैंगिक छळ प्रकरणी विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल


नराधमांनी छायाचित्रे पसरवण्याची दिली होती धमकी


पुणे : महिलांसोबत होणारी छेडछाड, लैंगिक छळ या प्रकरणी खबरदारी घेऊनदेखील अनेक ठिकाणी स्त्रियांना त्या गोष्टींना सामोरे जावे लागते. अशीच घटना पुणे येथील भारती विद्यापीठ आंबेगाव पठार परिसरात घडली. एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने छेडछाडीला कंटाळून गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना धक्कादायक उघडकीस आली आहे.


महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थीनी शिकवणीला जात असताना दोन नराधमांनी तिचा पाठलाग करत छेडछाड केल्या प्रकरणी विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.


अजिंक्य आवटे (रा. भोसरी), सुजल खुणे (रा. राम मंदिराजवळ, आंबेगाव पठार) अशी छेडछाडी प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मुलीच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सोनाली मिठारे तपास करत आहेत.



नेमकं प्रकरण काय?


विद्यार्थीनी महाविद्यालय शिकवणीला जात असताना आरोपी अजिंक्य आणि सुजल यांनी तिचा पाठलाग करुन छेडछाड केली. दोघांनी तिची छायाचित्रे काढली. त्यानंतर छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. गेले दोन महिने आरोपी तिला त्रास देत होते. त्यांच्या छेडछाडीमुळे मुलीने
राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे भारती विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे