सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली आहे. उत्तर भारतात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुढील दोन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे.
विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, उत्तर भारतात आलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम महाराष्ट्रावरही होत आहे. मागच्या ४८ तासांत पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत आणि विदर्भ मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पावसानं अतोनात नुकसान झालं आहे.


कुठे कुठे पावसाचा अलर्ट


हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, २० आणि २१ मार्च हे दोन दिवस पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.


मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून पावसाच्या सरी बरसतील. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्रातील भागांतही पावसाची शक्यता नाकारता येत नाही. पुण्यात सायंकाळच्या सुमारास ढगाळ हवामान आणि पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.


शेतकरी बांधवांना सतर्कतेचा इशारा


हा पाऊस २० मार्चपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता असून, २१ मार्चपासून हवामान पुन्हा कोरडे होईल. मात्र, या काळात काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. काही भागांत गारपिटीची शक्यता असल्याने काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


का बदलतंय हवामान?


सध्या उत्तर भारतात जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या परिसरात एक शक्तिशाली वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला आहे. त्याचा प्रभाव थेट मध्य भारतापर्यंत जाणवत असून, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात हे पावसाळी वातावरण तयार झाले आहे.


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २० मार्चपासून देशभरातील १९ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाला सुरुवात होईल. वारे ताशी ७० ते ८५ किलोमीटर वेगाने वाहू शकतात. उत्तर ते पूर्व आणि मध्य भारतापर्यंतच्या भागांवर परिणाम करेल. शेतकऱ्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.


महाराष्ट्रात कुठे किती नुकसान?


पाचगणी शहर आणि परिसरात जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे अंतिम टप्प्यात असलेल्या स्ट्रॉबेरीचं नुकसान झालं. तर गव्हालाही पावसाचा फटका बसला आहे. जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. वझर सरकटे गाव परिसरात गारपीट झाली. तर तळणी मंडळात मुसळधार पाऊस झाला.


पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं नुकसान झालं. जालना शहरात अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांचं नुकसान झालं. जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. धुळे जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. गारपिटीचा सर्वाधिक फटका साक्री तालुक्यातील कासारे, पेरेजपूर परिसराला बसला. पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं.

Comments
Add Comment

Nashik : पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी दोस्ती फाउंडेशनचा मदतीचा हाथ, भव्य अन्नदान व प्रसाद वाटप

Nashik : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा मानत दोस्ती फाउंडेशन

Rajvardhini Chavan: वयाच्या अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांत ऐतिहासिक पराक्रम; बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी चव्हाणने सर केले तब्बल १०० गड-कोट

पुणे: सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि दुर्गम वाटांवर वयाच्या अवघ्या ३ वर्षे आणि ४ महिन्यांच्या बालवयात एका

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Barshi Crime : माता न तू वैरिणी! १० महिन्यांच्या चिमुकलीची आईकडून हत्या

बार्शीत थरकाप उडवणारी घटना, आईने चिमुकलीची गळा आवळून केली हत्या   सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी

Pune News : पुण्यात आता 'एनडीआरएफ'चा कायमस्वरूपी तळ

मावळमधील तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : आपत्तीच्या काळात तातडीने मदत व बचाव

Beed Pakistani Connection : बीडमधील बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; एटीएसची धडक कारवाई

बीड : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (Maharashtra ATS) केलेल्या धडक तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील