नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर भाजपाचे ४०० पार जाण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रातही महायुतीने (Mahayuti) यासाठी चांगलाच जोर लावला आहे. त्यासाठी महायुतीच्या सातत्याने बैठकाही होत आहेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचंही नाव महायुतीसोबत जोडलं जात आहे. या युतीबाबत राज ठाकरे यांनी स्वतः जाहीर भाष्य केलेलं नसलं तरीही महायुती त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. तसेच मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांनीही महायुतीच्या बैठकांना हजेरी लावली आहे.
यानंतर आज पुन्हा एकदा दिल्लीमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह राज ठाकरेही हजेरी लावणार असल्याचे समजत आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये महायुतीची ही दुसरी बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत राजकीय वर्तुळातील चर्चांनी जोर धरला आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक बैठक केल्याचा दावा केला जात आहे. तसेच काल मुंबईतील हॉटेल ताज लॅण्डस या ठिकाणीही राज ठाकरे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. यातच भाजपा नेत्यांनी राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्यास स्वागत करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे भविष्यात मनसे महायुतीत सहभागी झाली तर वावगे वाटायला नको.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…