Mahayuti : महायुतीची आज पुन्हा दिल्लीमध्ये बैठक!

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेही राहणार उपस्थित


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर भाजपाचे ४०० पार जाण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रातही महायुतीने (Mahayuti) यासाठी चांगलाच जोर लावला आहे. त्यासाठी महायुतीच्या सातत्याने बैठकाही होत आहेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचंही नाव महायुतीसोबत जोडलं जात आहे. या युतीबाबत राज ठाकरे यांनी स्वतः जाहीर भाष्य केलेलं नसलं तरीही महायुती त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. तसेच मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांनीही महायुतीच्या बैठकांना हजेरी लावली आहे.


यानंतर आज पुन्हा एकदा दिल्लीमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह राज ठाकरेही हजेरी लावणार असल्याचे समजत आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये महायुतीची ही दुसरी बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत राजकीय वर्तुळातील चर्चांनी जोर धरला आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक बैठक केल्याचा दावा केला जात आहे. तसेच काल मुंबईतील हॉटेल ताज लॅण्डस या ठिकाणीही राज ठाकरे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. यातच भाजपा नेत्यांनी राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्यास स्वागत करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे भविष्यात मनसे महायुतीत सहभागी झाली तर वावगे वाटायला नको.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत