NCP Political Crisis : घड्याळ चिन्ह न वापरण्याचा सुप्रीम कोर्टाचा अजित पवार गटाला सल्ला

शरद पवारांचा फोटोही न वापरण्याची केली सूचना


नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) फूट पडल्यानंतर अनेक महिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह यावर दोन्ही गटांमध्ये वाद सुरु होता. अखेर बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवार गटाला (Ajit Pawar group) मूळ नाव आणि घड्याळ चिन्ह बहाल केले. तर शरद पवार गटाला (Sharad Pawar group) तुतारी हे नवे चिन्ह दिले. मात्र याविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. आज या प्रकरणी सुनावणी पार पडली असून सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह न वापरण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच शरद पवारांचे फोटोही न वापरण्याची सूचना केली आहे.


सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीदरम्यान, अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा शरद पवार गटाने केला. शरद पवार यांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला. यावर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि फोटो तसेच घड्याळ चिन्ह वापरु नका, असे आदेश अजित पवार गटाला दिले आहेत.



काय म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाने?


सुनावणीवेळी शरद पवार यांच्या नावाचा व छायाचित्राचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले. त्याचबरोबर अजित पवार गटाने निवडणुकीसाठी ‘घड्याळ’ या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही, असेही न्यायालयाने तोंडी सुचवले आहे.


दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि चिन्ह वापरणार नाही असं लेखी देण्याचे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत. यावर शनिवारी आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू, असे अजित पवार गटाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार १८ मार्च रोजी होणार आहे.


Comments
Add Comment

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील