Sangeet Natak Academy : अशोक सराफ आणि रुतुजा बागवे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

जाणून घ्या पुरस्कार विजेत्यांची नावे 


मुंबई : मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनातर्फे 'महाराष्ट्र भूषण' (Maharashtra Bhushan) हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. यानंतर पुन्हा एकदा केंद्र सरकारतर्फे त्यांना बहुमान मिळणार आहे. संगीत नाटक अकादमीतर्फे (Sangeet Natak Academy) दिल्या जाणाऱ्या​फेलोशिप आणि पुरस्कारांच्या यादीत अशोक सराफ यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. यांसोबतच विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली (Kalapini Komkali), अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe), ढोलकीवादक विजय चव्हाण (Vijay Chavan) यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.


केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला, इतर पारंपरिक समूह नृत्य, आदिवासी नृत्य क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाते. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. काल रात्री उशिरा पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश आहे.



संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी :


- अशोक सराफ, अभिनय
- विजय शामराव चव्हाण, ढोलकीवादक
- कलापिनी कोमकली, हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत
- नंदिनी परब गुजर, सुगम संगीत
- सिद्धी उपाध्ये, अभिनय
- महेश सातारकर, लोकनृत्य
- प्रमिला सूर्यवंशी, लावणी
- अनुजा झोकरकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक
- सारंग कुलकर्णी, सरोद वादक
- नागेश आडगावकर, अभंग संगीत
- ऋतुजा बागवे, अभिनय
- प्रियांका शक्ती ठाकूर, पारंपारिक कला


संगीत नाटक अकादमीच्या वतीने २०२३ या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.


Comments
Add Comment

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी

कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार

सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा,

Madgaon Tejas Express : तेजस एक्स्प्रेसमध्ये नाश्त्याऐवजी बिस्किट पुडा! IRCTCकडून कंत्राटदाराला दणका!

मडगाव : मडगाव तेजस एक्स्प्रेसमध्ये (Madgaon Tejas Express) प्रवाशांना दिल्या गेलेल्या खाद्यपदार्थांच्या निकृष्ट दर्जाबाबत