NCP MLA disqualification : निवडणूक आयोगाने दिलेल्या राष्ट्रवादीच्या निकालाबाबत काय म्हणाले राहुल नार्वेकर?

१४ फेब्रुवारीला राहुल नार्वेकर करणार सुनावणी


मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल लावत मूळ पक्ष व घड्याळाचं चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) बहाल केलं. त्यामुळे शरद पवारांना (Sharad Pawar) प्रचंड मोठा धक्का बसला. यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) या प्रकरणी निकाल लावणार आहेत. ते सुद्धा अजितदादांच्या बाजूनेच निकाल लावतील, अशा चर्चा होत असताना राहुल नार्वेकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणी (NCP MLA disqualification case) मेरिटनुसारच निकाल दिला जाईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भावनाकडून किंवा निवडणूक आयोगाकडून कोणतीही कागदपत्रे मागवण्यात आलेली नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले.



१४ फेब्रुवारी रोजी होणार सुनावणी


राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर १४ फेब्रुवारी रोजी निकाल देणार आहेत. गेल्या महिन्यात राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला होता. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे अथवा एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलं नव्हतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी ते काय निकाल देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे