Manoj Jarange Patil : मनोज जरांगे १० फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार!

  91

'जरांगेंच्या आंदोलनाचा काय फायदा झाला?' नेटकर्‍यांचा सवाल


जालना: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला मुद्दा अजूनही पूर्णपणे निकालात आलेला नाही. जालना (Jalna) येथील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर (Maratha protesters) झालेल्या लाठीचार्जमुळे हे आंदोलन राज्यव्यापी झाले. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्‍या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना राज्यभरातून लाखो मराठ्यांनी पाठिंबा दिला. मात्र, अंतिम तारीख उलटून गेल्यावरही मराठा आरक्षण मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.


मनोज जरांगे हे काहीच दिवसांपूर्वी लाखो मराठ्यांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, २७ जानेवारी रोजी ते वाशीपर्यंत पोहोचताच त्यांच्या सर्व मागण्या मान्य करणारा जीआर सरकारने काढला. तसेच, इतर कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे लवकरच मराठा आरक्षण मिळणार अशी खात्री मराठ्यांना मिळाली. याबद्दल राज्यभरात जल्लोषही साजरा करण्यात आला. मात्र, दुसरीकडे सोशल मीडियावरून मरोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामुळे काय फायदा झाला? असा प्रश्न काही युजर्सकडून विचारण्यात येत आहे. त्यावर जरांगेंनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर दिलं.


सोशल मीडियावर बोलणाऱ्या काही लोकांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील काही नेत्यांकडून माझ्याविरोधात बोलण्याची सुपारी घेतली आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. “महाराष्ट्रातील काही १०-२० जणं सरकारी व विरोधी पक्षांची सुपारी घेऊन सलग बोलत राहतात. आंदोलनातून काय मिळालं, काय नाही मिळालं असं ते सोशल मीडियावर विचारत असतात. पण हा लढा त्यांच्यासाठी नाही आहे. हा लढा मराठा समाजासाठी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातले लोक जाणून-बुजून बोलतायत. जर ते इथून पुढे गप्प बसले नाहीत, तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह नावं जाहीर करेन”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.



मराठा समाजाचेही काही जळणारे नेते


“मला बाजूला करण्यासाठी यांचे प्रयत्न चालू आहेत. माझे करोडो मराठा बांधव मला सांगत नाहीत तोपर्यंत मी बाजूला हटत नाही. श्रेयासाठी हे विनाकारण मध्ये घुसायला लागले आहेत. मराठा समाजाचेही काही जळणारे नेते आहेत”, असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.



जरांगे मॅनेजही होत नाही, फुटतही नाही...


“हे ठरलेले १५-२० जण आहेत. मराठ्यांच्या जिवावर खाणारे आहेत ते. गरीब घरातला मुलगा मराठ्यांसाठी लढतोय ही यांची सगळ्यात मोठी पोटदुखी आहे. हा मॅनेजही होत नाही, फुटतही नाही आपलं काय होणार? असा प्रश्न त्यांना पडलाय. मी १० तारखेला या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बेमुदत उपोषण करणार आहे. जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत उपोषण करणार. मी कुठेही बसलो, तरी मराठा आरक्षणावरच बोलतो. मला चार भिंतीत दुसरं काही करायचं असतं, तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो. लोकांमध्ये कशाला आलो असतो?” असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक