Manoj Jarange : मनोज जरांगेंना वाटते आंदोलनाकडे दुर्लक्ष होण्याची भीती

  235

मुंबईतील आंदोलनाआधी ट्रॅप लावला जात असल्याचा जरांगेंचा आरोप


जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) येत्या २० जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असतानाच आज मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) यांनी मुंबईतील आंदोलनाआधी ट्रॅप लावला जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मला शब्दांत अडकवून गुंतवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काहीतरी घडवायचे असे प्लॅनिंग सुरू आहे. पण आता गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही.


माझ्यावर ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारे, मराठा समाजाच्या जीवावर मोठे झालेले ज्यांच्या दुकानदाऱ्या होत्या त्या आता सगळ्या बंद पडल्या आहेत. अशा लोकांना मी आतून खपत नाही. या लोकांना आरक्षणाचा विषय संपू द्यायचाच नव्हता. त्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करून आमच्या आंदोलनाचा काही मंत्र्यांना अपमान करायचा आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.


जरांगे पाटील पुढे म्हणाले, याबाबत मला सरकारी अधिकाऱ्यांकडूनच माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता आम्ही सावध झालो आहोत. आमच्या आंदोलनात कुणी हिंसाचाराचा प्रयत्न करत आहे का, यावर आता आम्ही बारकाईने लक्ष ठेवणार आहोत. काल राज्य सरकारमधील मंत्र्यांची बैठक झाली. काही जणांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. तर काही जणांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचाही सल्ला दिल्याची माहिती आम्हाला समजली आहे. या माहितीची खातरजमा करत आहोत. त्यानंतर आरक्षणाला विरोध असणाऱ्या मंत्र्यांचीही नावं आम्हाला कळतील, असे जरांगे पाटील म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक