चीन दौऱ्यानंतर मालदीवकडून भारताला अल्टिमेटम, १५ मार्चपर्यंत भारतीय सैन्य हटवा

नवी दिल्ली: मालदीव आणि भारत यांच्यांतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यातच मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू यांनी सांगितले की भारताने १५ मार्चआधी आपले सैन्य हटवावे. याआधी त्यांनी नाव न घेता सांगितले होते की आम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणालाही नाही.


गेल्या काही वर्षा मालदीवमध्ये भारतीय लष्कराची लहान तुकडी तेथे उपस्थित आहे. मालदीवच्या मागील सरकारच्या आग्रहानंतर भारत सरकारने आपले सैन्य तेथे तैनात केले होते. समुद्री सुरक्षा आणि आपातकालीन कार्यांमध्ये मदतीसाठी भारतीय लष्कराची एक तुकडी मालदीवमध्ये तैनात करण्यात आली आहे.


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आलेल्या विधानात म्हटले होते की त्यांच्या देशाला आशा आहे की भारत लोकांच्या लोकतांत्रिक इच्छेचा सन्मान करेल.


मुईज्जू हे शनिवारी चीनवरून पाच दिवसांच्या दौऱ्यावरून परतले होते. ते मालदीवला पोहोचताच म्हटले की भले आमचा देश लहान आहे मात्र आम्हाला बुली करण्याचा लायसन्स कोणालाही नाही. दरम्यान, मुईज्जू यांनी प्रत्यक्षपणे नाव घेऊन हे विधान केलेले नाही. मात्र त्यांनी भारताला निशाणा केला होता असे बोलले जाते.

Comments
Add Comment

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा