चीन दौऱ्यानंतर मालदीवकडून भारताला अल्टिमेटम, १५ मार्चपर्यंत भारतीय सैन्य हटवा

नवी दिल्ली: मालदीव आणि भारत यांच्यांतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यातच मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू यांनी सांगितले की भारताने १५ मार्चआधी आपले सैन्य हटवावे. याआधी त्यांनी नाव न घेता सांगितले होते की आम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणालाही नाही.


गेल्या काही वर्षा मालदीवमध्ये भारतीय लष्कराची लहान तुकडी तेथे उपस्थित आहे. मालदीवच्या मागील सरकारच्या आग्रहानंतर भारत सरकारने आपले सैन्य तेथे तैनात केले होते. समुद्री सुरक्षा आणि आपातकालीन कार्यांमध्ये मदतीसाठी भारतीय लष्कराची एक तुकडी मालदीवमध्ये तैनात करण्यात आली आहे.


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आलेल्या विधानात म्हटले होते की त्यांच्या देशाला आशा आहे की भारत लोकांच्या लोकतांत्रिक इच्छेचा सन्मान करेल.


मुईज्जू हे शनिवारी चीनवरून पाच दिवसांच्या दौऱ्यावरून परतले होते. ते मालदीवला पोहोचताच म्हटले की भले आमचा देश लहान आहे मात्र आम्हाला बुली करण्याचा लायसन्स कोणालाही नाही. दरम्यान, मुईज्जू यांनी प्रत्यक्षपणे नाव घेऊन हे विधान केलेले नाही. मात्र त्यांनी भारताला निशाणा केला होता असे बोलले जाते.

Comments
Add Comment

अटल पेन्शन योजनेस २०३१ पर्यंत मुदतवाढ

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाने लाखो लोकांना पेन्शनची हमी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

नववर्षाच्या पार्टीतून थेट हत्येपर्यंत; खर्चाच्या भीतीने दोन मित्रांनी तरुणाचा घेतला जीव

बंगळुरु : कर्नाटकातील रामनगर परिसरात घडलेला तरुणाचा संशयास्पद मृत्यूचा अखेर उलघडा झाला. पोलिस तपासात समोर

Republic day parade: यंदा कर्तव्यपथावर अवतरणार गणपती बाप्पा

नवी दिल्ली : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर यंदा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख ठळकपणे दिसणार आहे.

Pension Scheme India : पेन्शनधारकांना सरकारने दिलयं मोठ गिफ्ट..नक्की काय ?

Pension Scheme India: केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत अटल पेन्शन योजनेचा वेळ वाढवण्याची मंजुरी दिली

Plane Crash News : हवेतच विमानाचे नियंत्रण सुटले अन् दोन्ही वैमानिकांचा...प्रयागराजमध्ये भीषण अपघात

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आज दुपारी भारतीय वायू सेनेच्या एका प्रशिक्षणार्थी विमानाला

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड