चीन दौऱ्यानंतर मालदीवकडून भारताला अल्टिमेटम, १५ मार्चपर्यंत भारतीय सैन्य हटवा

नवी दिल्ली: मालदीव आणि भारत यांच्यांतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यातच मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू यांनी सांगितले की भारताने १५ मार्चआधी आपले सैन्य हटवावे. याआधी त्यांनी नाव न घेता सांगितले होते की आम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणालाही नाही.


गेल्या काही वर्षा मालदीवमध्ये भारतीय लष्कराची लहान तुकडी तेथे उपस्थित आहे. मालदीवच्या मागील सरकारच्या आग्रहानंतर भारत सरकारने आपले सैन्य तेथे तैनात केले होते. समुद्री सुरक्षा आणि आपातकालीन कार्यांमध्ये मदतीसाठी भारतीय लष्कराची एक तुकडी मालदीवमध्ये तैनात करण्यात आली आहे.


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आलेल्या विधानात म्हटले होते की त्यांच्या देशाला आशा आहे की भारत लोकांच्या लोकतांत्रिक इच्छेचा सन्मान करेल.


मुईज्जू हे शनिवारी चीनवरून पाच दिवसांच्या दौऱ्यावरून परतले होते. ते मालदीवला पोहोचताच म्हटले की भले आमचा देश लहान आहे मात्र आम्हाला बुली करण्याचा लायसन्स कोणालाही नाही. दरम्यान, मुईज्जू यांनी प्रत्यक्षपणे नाव घेऊन हे विधान केलेले नाही. मात्र त्यांनी भारताला निशाणा केला होता असे बोलले जाते.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या