आम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणाला नाही, चीन दौऱ्यानंतर पाहा काय म्हणाले मालदीवचे राष्ट्रपती

नवी दिल्ली: मालदीवचे(maldives) राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू चीनच्या पाच दिवसांच्या दौऱ्यानंतर परतले आहे. ते मालदीवला परतताच त्यांची भाषाच बदलली आहे. दौऱ्यावरून परतताच ते म्हणाले की आम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणालाही नाही.


मुईज्जू म्हणाले, पाच दिवसांच्या चीनच्या दौऱ्यानतंर राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी भेट घेतली होती. त्यांचा हा दौरा यावेळेस होता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध अपमानजनक विधान केल्याप्रकरणी मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांना निलंबित केले होते. यावरून भारत आणि मालदीव दोन्ही देशांमध्ये राजकीय वाद वाढला आहे.



मुईज्जू यांची भाषा बदलली


भारतात सुरू असलेल्या बॉयकॉट मालदीव या ट्रेंडदरम्यान मुईज्जू यांनी चीनला अपील केले होते की त्यांनी अधिकाधिक चीनी पर्यटक मालदीवला पाठवावेत. मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करताना मुईज्जू म्हणाले होते की कोरोनाआधी आमच्या देशात सर्वाधिक पर्यटक चीनमधून येत होते.



चीनचा दौरा वादात का होता?


मुइज्जू यांचा चीनचा हा पहिला राजकीय दौरा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून झालेल्या वादावरून मालदीवच्या तीन मंत्र्यानी सोशल मीडियावर अपमानजनक विधान केले होते. यानंतर सोशल मीडियावर हे प्रकरण तापले होते. या प्रकरणी मालदीवच्या तीन मंत्र्यांना सरकारकडून निलंबित करण्यात आले होते.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव