आम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणाला नाही, चीन दौऱ्यानंतर पाहा काय म्हणाले मालदीवचे राष्ट्रपती

नवी दिल्ली: मालदीवचे(maldives) राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू चीनच्या पाच दिवसांच्या दौऱ्यानंतर परतले आहे. ते मालदीवला परतताच त्यांची भाषाच बदलली आहे. दौऱ्यावरून परतताच ते म्हणाले की आम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणालाही नाही.


मुईज्जू म्हणाले, पाच दिवसांच्या चीनच्या दौऱ्यानतंर राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी भेट घेतली होती. त्यांचा हा दौरा यावेळेस होता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध अपमानजनक विधान केल्याप्रकरणी मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांना निलंबित केले होते. यावरून भारत आणि मालदीव दोन्ही देशांमध्ये राजकीय वाद वाढला आहे.



मुईज्जू यांची भाषा बदलली


भारतात सुरू असलेल्या बॉयकॉट मालदीव या ट्रेंडदरम्यान मुईज्जू यांनी चीनला अपील केले होते की त्यांनी अधिकाधिक चीनी पर्यटक मालदीवला पाठवावेत. मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करताना मुईज्जू म्हणाले होते की कोरोनाआधी आमच्या देशात सर्वाधिक पर्यटक चीनमधून येत होते.



चीनचा दौरा वादात का होता?


मुइज्जू यांचा चीनचा हा पहिला राजकीय दौरा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून झालेल्या वादावरून मालदीवच्या तीन मंत्र्यानी सोशल मीडियावर अपमानजनक विधान केले होते. यानंतर सोशल मीडियावर हे प्रकरण तापले होते. या प्रकरणी मालदीवच्या तीन मंत्र्यांना सरकारकडून निलंबित करण्यात आले होते.

Comments
Add Comment

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना