मालदीवबाबत भारताकडून व्यक्त होतोय रोष, EaseMyTrip कडून सर्व फ्लाईट्स रद्द

  88

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर भारताचा मालदीववरील रोष काही कमी होत नाहीये. मालदीववर आता सामान्य लोकांसोहत भारताची दिग्गज ट्रॅव्हल कंपन्यांनीही आपला रोष व्यक्त करण्यात सुरूवात केली आहे.


देशातील मोठी ट्र्र्रॅव्हल कंपनी EaseMyTripने मालदीवचे आपले सर्व फ्लाईट्स बुकिंग रद्द केले आहेत. कंपनीचे फाऊंडर आणि सीईओ निशांत पिट्टी यांनी खुद्द सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. निशांत पिट्टी म्हणाले, देशाच्या एकजुटतेमध्ये सामील होत EaseMyTripने मालदीवचे सर्व फ्लाईट्स बुकिंग रद्द करण्यचा निर्णय घेतला आहे.


 


मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींबाबत त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. हा मुद्दा भारताने मालदीवच्या मोहम्मद मुईज्जू सरकारसमक्ष उचलला होता. भारताने आक्षेप घेतल्यानंतर मालदीव सरकारकडून कारवाई करण्यात आली. मालदीवच्या तीन मंत्र्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले.


मालदीव सरकारने कडक पावले उचलत उप मंत्री(युवा अधिकारिता, सूचना आणि कला मंत्रालय) मरियम शिऊना, उप मंत्री(परिवहन आणि नागरी उड्डाण मंत्रालय) हसन जिहान आणि उप मंत्री(युवा अधिकारिता सूचना आणि कला मंत्रालय) मालशा यांनी निलंबित केले.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या