मालदीवबाबत भारताकडून व्यक्त होतोय रोष, EaseMyTrip कडून सर्व फ्लाईट्स रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर भारताचा मालदीववरील रोष काही कमी होत नाहीये. मालदीववर आता सामान्य लोकांसोहत भारताची दिग्गज ट्रॅव्हल कंपन्यांनीही आपला रोष व्यक्त करण्यात सुरूवात केली आहे.


देशातील मोठी ट्र्र्रॅव्हल कंपनी EaseMyTripने मालदीवचे आपले सर्व फ्लाईट्स बुकिंग रद्द केले आहेत. कंपनीचे फाऊंडर आणि सीईओ निशांत पिट्टी यांनी खुद्द सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. निशांत पिट्टी म्हणाले, देशाच्या एकजुटतेमध्ये सामील होत EaseMyTripने मालदीवचे सर्व फ्लाईट्स बुकिंग रद्द करण्यचा निर्णय घेतला आहे.


 


मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींबाबत त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. हा मुद्दा भारताने मालदीवच्या मोहम्मद मुईज्जू सरकारसमक्ष उचलला होता. भारताने आक्षेप घेतल्यानंतर मालदीव सरकारकडून कारवाई करण्यात आली. मालदीवच्या तीन मंत्र्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले.


मालदीव सरकारने कडक पावले उचलत उप मंत्री(युवा अधिकारिता, सूचना आणि कला मंत्रालय) मरियम शिऊना, उप मंत्री(परिवहन आणि नागरी उड्डाण मंत्रालय) हसन जिहान आणि उप मंत्री(युवा अधिकारिता सूचना आणि कला मंत्रालय) मालशा यांनी निलंबित केले.

Comments
Add Comment

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत