Neha Pendse : प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी सहा लाखांच्या दागिन्यांची चोरी!

पोलिसांनी एका नोकराला घेतलं ताब्यात


मुंबई : हल्ली सिनेकलांकारांसोबत (Movie actors) चोरीचे तसेच सायबर क्राईमच्या (Cyber Crime) माध्यमातून लाखो, करोडो रुपयांचा गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच 'भाग्यलक्ष्मी' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिच्या घरी चोरी झाली आहे. वांद्रे (Bandra) येथील तिच्या राहत्या घरातून तब्बल सहा लाखांचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी नेहा पेंडसेच्या पतीच्या ड्रायव्हरने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


वांद्रे पश्चिम येथे अरेटो बिल्डिंगमध्ये नेहाचा व तिचा पती शार्दुल सिंह बयास यांचा आलिशान फ्लॅट आहे. या फ्लॅटमधून काही दागिने चोरीला गेले आहेत. यामध्ये लग्नात त्यांना मिळालेलं एक सोन्याचं कडं आणि एक हिऱ्यांची अंगठी याचा समावेश आहे. त्यांची किंमत तब्बल सहा लाख आहे. या प्रकरणी नेहाचा पती शार्दुल याचा ड्रायव्हर रत्नेश झा याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


२८ डिसेंबर रोजी शार्दुलच्या लक्षात आलं की, कपाटात असणारं सोन्याचं कडं आणि एक हिऱ्यांची अंगठी गायब होती. अनेकदा शार्दुल हे कडं आणि अंगठी घालायचा आणि कपाटात काढून ठेवायचा. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने या दोन्ही वस्तू घरात काम करणाऱ्या सुमीत नावाच्या कर्मचाऱ्याकडे दिल्या आणि त्याला त्या कपाटात ठेवायला सांगितल्या. पण त्या वस्तू नंतर कपाटात मिळाल्याच नाहीत.


या प्रकरणी शार्दुलने घरातल्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. परंतु त्यापैकी कोणाकडूनच दागिन्यांविषयी काही माहिती मिळाली नाही किंवा त्यांच्याकडे दागिने सापडले नाहीत. या चौकशीवेळी सुमीत मात्र अनुपस्थित होता, त्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावला. त्याला फोन केला असता, त्याने तो कुलाबा इथे मावशीकडे आल्याचं सांगितलं आणि घरी येण्यास टाळाटाळ केली. सुरुवातीला त्याने दागिने कपाटात ठेवल्याचं सांगितलं. पण दागिने नसल्याने शार्दुल यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी सुमीत नावाच्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील

BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.

शाळांमध्ये झळकणार सरकारी योजनांचे फलक; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : मुंबई विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे

शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने सज्ज आणि सक्षम