Ration Shopkeepers Strike : सामान्यांच्या नववर्षाची सुरुवात संकटाने; १ जानेवारीपासून रेशन दुकानदारांचा संप

काय आहेत मागण्या?


मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षात (New year) प्रवेश करताना येणारं वर्ष आनंदाचं, समृद्धीचं असेल अशा भावना आपण व्यक्त करतो. मात्र, सामान्य माणसाच्या (Common man) नशिबात लिहिलेल्या समस्या काही जायचं नाव घेत नाहीत. यंदाच्या नववर्षाची सुरुवातच सामान्यांसाठी एका वाईट बातमीने होणार आहे. राज्यभरातील सर्व रेशन दुकानदार त्यांच्या मागण्यांसाठी १ जानेवारीपासून बेमुदत संप (Ration Shopkeepers Strike) पुकारणार आहेत. त्यामुळे सामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.


विविध मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील संपावर असणार आहे. तर १ जानेवारीपासून पुण्यासह राज्यभरातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर असणार आहेत.



काय आहेत मागण्या?



  • रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा.

  • टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या.

  • मार्जिन मनी ३०० रुपये करा.

  • कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरुपी करा.

  • तसेच चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा.


राज्यात सुमारे ५३ हजार रास्त भाव दुकानदार आहेत. त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे. नव वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून रेशनचं दुकान बंद असणार आहे. त्यामुळे सामान्य आणि गरजू नागरिकांचे हाल होणार आहेत.



Comments
Add Comment

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता 'मकोका' लागणार!

गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी; बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी संयुक्त भरारी पथके आणि सीमांवर

वरिष्ठांनी भाजपसोबत जायचे ठरवल्यास दुसरा पर्याय निवडेन!

आ. रोहित पवार यांचा दावा; आजोबा आणि आत्याला दिला इशारा मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय

एकनाथ शिंदेंकडून २०२९ साठी स्वबळाची चाचपणी?

२०० मतदारसंघात संघटनात्मक बांधणी सुरू; मंत्री उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंवर सोपवली मोठी जबाबदारी मुंबई :